शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

राजकारणी म्हणून मी अपयशी - अमिताभ बच्चन

By admin | Published: September 16, 2016 1:04 PM

राजकारणात असताना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचं शल्य अजूनही जाणवत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - राजकारणात असताना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचं शल्य अजूनही जाणवत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांची अलाहाबादचा खासदार अशी एक छोटीशी राजकीय कारकिर्द झाली. मात्र, अलाहाबादच्या जनतेच्या अपेक्षा खासदार म्हणून आपण पूर्ण करू शकलो नाही याची खंत अजूनही मनातून जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अत्यंत जुने मित्र असलेल्या राजीव गांधींच्या प्रेमाखातर बच्चन यांनी निवडणूक लढवली. प्रचंड मताधिक्याने ते निवडूनही आले. मात्र, तीनच वर्षांत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. निवडणूक लढवताना तुम्ही जनतेला खूप आश्वासनं देता आणि आता मागे वळून बघताना, ती आश्वासनं मी पूर्ण करू शकलो नाही हे आठवतं, असं ते म्हणाले आहेत.
मी साजाजिक जीवनात शक्य तेवढं काम केलं आहे, परंतु अलाहाबादच्या जनतेच्या मनात मात्र मी न केलेलं काम राहील असं ते म्हणाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. मला राजकारणी म्हणून राहणं शक्य नव्हतं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य नव्हतं म्हणून मी राजकारण सोडलं असं त्यांनी सांगितलं आहे. 
माझं काम कॅमेऱ्यासमोर जाणं, आणि उत्कृष्ट आहे ते सादर करणं हे आहे, आणि मला त्यावरून लक्ष विकेंद्रीत करायचं नाहीये असं बच्चन म्हणाले. अमेरिकेमध्ये हॉलीवूडमधले कलाकार उघड उघड राजकीय भूमिका घेतात, ते तसं करू शकतात कारण अमेरिकेतले प्रेक्षक हे जास्त प्रगल्भ आहेत, असं मत त्यांनी नोंदवलं आहे. हॉलीवूडचे प्रेक्षक खूप प्रगल्भ आहेत, आपल्याकडे थोडी मर्यादा आहे. मी काँग्रेसचा प्रचार करत असताना, चुकून विरोधकांच्या कार्यक्रमस्थळी गेलो तर तिथल्या तरूणांनी मला सांगितलं की आम्ही तुमचे चाहते आहोत, परंतु तुम्ही ताबडतोब इथून निघून जा. लोकांनी कलाकारांवर प्रेम केलं म्हणजे त्यांच्या राजकारणावरही प्रेम करायला पाहिजे असं नाही, अशी पुस्तीही बच्चन यांनी जोडली.