शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

कपबशा धुवत, लोकांना चहा देत मी मोठा झालो; चहाशी माझे नाते खूप गहिरे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:47 IST

मोदींनी भाषणात कपबशीसोबतचे आपले नाते सांगत मोठ्या खुबीने मित्रपक्षाला मतदान करण्याचे उपस्थितांना आवाहन केले

मिर्झापूर: कपबशा धुवत आणि लोकांना चहा देत मी लहानाचा मोठा झालो. मोदी व चहाचे नाते खूप गहिरे आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले. रालोआचा घटकपक्ष असलेल्या अपना दल-एसचे कपबशी हे निवडणूक चिन्ह आहे. मोदींनी भाषणात कपबशीसोबतचे आपले नाते सांगत मोठ्या खुबीने मित्रपक्षाला मतदान करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

मोदी रालोआचा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातील अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल, रॉबर्टसगंजमधील उमेदवार रिंकी कोल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करत होते. 

मोदी म्हणाले, आज मी भाषण न करता तुमच्याशी गप्पाटप्पा करेन. तुम्ही-आम्ही जेव्हा घर उभारतो आणि घर उभारताना एखादा मिस्त्री  ठेवतो. तेव्हा आपण काय दर महिन्याला नवा मिस्त्री ठेवतो का? म्हणजे एक महिना हा मिस्त्री काम  करेल, दुसऱ्या महिन्यात  दुसरा, तिसऱ्या महिन्यात तिसरा आणि चौथ्या महिन्यात चौथा. असे झाले तर ते घर बांधून तरी पूर्ण होईल का? तसेच ते घर राहण्यालायक असेल का असा सवाल मोदींनी केला.

इंडिया आघाडी समुदायाला दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छिते!

मऊ (उप्र): काँग्रेस आणि सपाची इंडिया आघाडी भारतातील बहुसंख्याक समुदायाला दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छिते, असा घणाघात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केला. ते म्हणाले की, ‘पूर्वांचलची ही भूमी शौर्य आणि क्रांतीची भूमी आहे. सपा आणि काँग्रेसच्या घराणेशाहीने पूर्वांचलला माफिया, दुर्भिक्ष्य, दारिद्र्य व असहाय्यतेचे क्षेत्र बनवले आहे. मात्र, गेल्या १० वर्षांपासून पूर्वांचल देशाच्या पंतप्रधानांची आणि सात वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची निवड करत आहे आणि म्हणूनच पूर्वांचल हे सर्वात खास आहे.

हे लोक कट्टर जातीयवादी आहेत... 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी जातीयवादी असल्याची टीका केली.
  • मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी या आघाडीने राज्यघटना बदलण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. देशातील जनतेने इंडिया आघाडीला पुरेपूर ओळखले आहे.
  • हे लोक कट्टर जातीयवादी आहेत. जेव्हा ते सरकार स्थापन करतील तेव्हा ते या आधारावरच निर्णय घेतील, असा दावाही मोदींनी केला.

पाच वर्षांत पाच पंतप्रधान योग्य आहे?

छोटे घर बांधत असतानाही कोणी वारंवार मिस्त्री बदलत नाहीत. मग पाच वर्षांत पाच पंतप्रधान बदलणे कितपत योग्य आहे, असा सवाल मोदींनी केला.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी