शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

... "तेव्हा मी मुंडन करुन अयोध्येतून पळाले होते"; उमा भारतींनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 19:45 IST

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीतील प्राणप्रतिष्ठा सोहहळ्याची चर्चा आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी हा भव्य-दिव्य सोहळा होत असून देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. यानिमित्ताने रामजन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतलेल्या, रामजन्मभूमीत आंदोलनासाठी अयोध्येत जाऊन कारसेवा केलेल्या बहुतांश कारसेवकांना अयोध्येचं निमंत्रण दिलं जात आहे. अयोध्येतील या कारसेवेत मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनीही योगदान दिलं होतं. त्याच, अनुषंगाने त्यांनी कारसेवेतील काही आठवणी जागवल्या आहेत. 

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात, रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेल्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपा नेत्या उमा भारती यांचाही आंदोलनात सक्रीय सहभाग होता. विशेष म्हणजे या आंदोलनातील सहभागावेळी आपण शहीद होतो की काय, असे प्रसंगही तीनवेळा घडल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

मला रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र येथून फोन आला होता, तुम्ही २२ ऐवजी १८ जानेवारीलाच अयोध्येला या. त्यामुळे, मी अयोध्येत १८ जानेवारीपासूनच असणार आहे. मी १२ वर्षांची असल्यापासून या दिवसाची वाट पाहात होते. रामचंद्रास परमहंस यांनी मला ही जागा दाखवली होती. तेव्हा, बंद कुलूपात रामलला होते, केवळ पुजेसाठी ते कुलूप उघडले जात. हिंदू समाजाचा हा केवढा अपमान आहे, अशी भावना त्यावेळी माझ्या मनी होती. 

तेव्हापासूनच मी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले आहे. पहिल्यांदा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा आम्ही बांधाच्या तुरुंगात होतो. आमच्यासोबत मिश्रा, वसुंधरा आणि मेहता हेही होते. एका गेस्ट हाऊसला तुरुंगाचा दर्जा देऊन आम्हाला तेथे ठेवले होते. मात्र, मी डोक्याचं मुंडन करुन, वेश बदलून तेथून पळून गेले होते, अशी आठवण आणि रामजन्मभूमी आंदोलनातील आपला सहभाग उमा भारती यांनी स्पष्ट केला. 

२ नोव्हेंबर रोजीची कारसेवा सर्वात विशेष मानली जाते. त्यावेळी, एका समुहाचं नेतृत्त्व मला दिले होते, आमच्या सर्वांवर भीषण लाठीचार्ज झाला होता, गोळीबारही करण्यात आला होता. ज्यामध्ये, प्रा. अरोडा आणि राम व शरद कोठारी यांचा मृत्यू झाला होता. या कारसेवेत मोठा हिंसाचार झाला होता. एक धाडसाचं आणि शालिनतेचं प्रदर्शन होतं. त्यानंतर, ६ डिसेंबर रोजीची कारसेवा घडली. त्या आंदोलनातही मी सहभागी होते, अशी आठवण सांगताना ६ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेचा वृत्तांतही उमा भारती यांनी सांगितला. तसेच, यावेळी मी या आंदोलनात मृत्यूमुखी पडते, किंवा शहीद होते की काय, असेही वाटल्याचं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपा