शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

MP Crisis: ‘माझ्या हातात बॉम्ब नाही, पिस्तूल नाही आणि शस्त्रे नाहीत तरीही पोलिसांनी रोखलं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 08:56 IST

MP Crisis: मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही राज्यपालांना पत्र लिहून बंगळुरु येथील २२ आमदारांना परत आणण्याची मागणी केली आहे

ठळक मुद्देकमलनाथ सरकारला विधानसभेत तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावाभाजपाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी बंडखोर काँग्रेस आमदारांना भेटण्यासाठी दिग्विजय सिंह पोहचले कर्नाटकात

बंगळुरु – मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांकडून तिनदा बहुमत चाचणी करण्याचे आदेश मिळाल्यानंतरही काँग्रेसने चालढकल करत आता बंडखोरांना शांत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे समर्थक २२ बंडखोर आमदार गेल्या १० दिवसांपासून बंगळुरु येथे एका हॉटेलमध्ये आहेत.

बुधवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंहसह काँग्रेस नेते बंगळुरुला पोहचले. कर्नाटकातील रमादा हॉटेलच्या बाहेर पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर या नेत्यांनी हॉटेलसमोरील रस्त्यावरच धरणं आंदोलन सुरु केलं. त्यानंतर पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतलं.

यावेळी दिग्विजय सिंह म्हणाले की, पोलिस आम्हाला आमदारांना भेटू देत नाहीत. मी मध्य प्रदेशमधील राज्यसभेचा उमेदवार आहे. 26 तारखेला राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेत मतदान होणार आहे. आमच्या आमदारांना या हॉटेलमध्ये बंधक बनवण्यात आलं आहे. त्यांना आमच्याशी बोलायचे आहे, परंतु त्यांचे मोबाइल काढून घेण्यात आले. आमदारांचा जीव धोक्यात आहे. माझ्या हातात बॉम्ब नाही, पिस्तूल नाही आणि शस्त्रे नाहीत. तरीही पोलिस मला का रोखत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिग्विजय सिंह यांच्यासोबत कांतीलाल भूरिया, आमदार आरिफ मसूद आणि कुणाल चौधरी हे देखील बंगळुरूला गेले आहेत. याठिकाणी कर्नाटकचे कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार त्यांना घेण्यासाठी आले होते.

मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही राज्यपालांना पत्र लिहून बंगळुरु येथील २२ आमदारांना परत आणण्याची मागणी केली आहे. भाजपाकडून त्यांना डांबून ठेवण्यात आलं आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे हे आमदार परतल्याशिवाय बहुमत चाचणी घेऊ नये. जीतू पटवारी यांच्यासह ४ मंत्र्यांनी बंडखोरांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही पटवारी यांच्यासह असलेल्या मंत्र्यांना रिसोर्टच्या बाहेर रोखण्यात आलं. त्यावेळी पोलिसांशी वाद घातल्यावर सर्व मंत्र्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

दरम्यान, कमलनाथ सरकारला विधानसभेत तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह १० भाजपा आमदारांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून तातडीने सुनावणी घेण्याचे ठरविले. या सुनावणीत सहभागी होण्यासाठी १७ बंडखोर काँग्रेस आमदारांनीही अर्ज केला आहे. कोरोनामुळे अधिवेशन २७ पर्यंत तहकूब असूनही विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाविरुद्ध काँग्रेसने याचिका केली आहे. आज याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा