शहरं
Join us  
Trending Stories
1
रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंकाळ्या...; मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण
3
नीट प्रकरणात दोन्ही आरोपींना ५ दिवसांची CBI कोठडी; पालकांनाही आरोपी करण्याची मागणी
4
जुलैत पावसाची सेंच्युरी; सरासरीपेक्षा १०६ टक्के बरसण्याचा अंदाज
5
मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी
6
MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल
7
बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांची बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा
8
आधी हिजाबबंदी, आता जीन्स, टी-शर्टलाही मनाई; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेसकोड
9
नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती
10
पासपोर्ट सेवा केंद्र भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई; दीड कोटीची रोकड, डायऱ्या दलालांकडून जप्त
11
“ऋण काढून सण करायला लावणारा अतिरिक्त अर्थसंकल्प”; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
12
Pune :पुणे सोलापूर हायवेवर कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू
13
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
14
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   
15
"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?
16
"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
18
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
19
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...

"राष्ट्रसेवेसाठी समर्पित जीवन, व्यंकय्या नायडू यांच्याकडून मी बरेच काही शिकलोय"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:37 AM

व्यंकय्या गारू आणि माझा अनेक दशकांपासूनचा परिचय आहे. आम्ही एकत्र काम केले आहे आणि मी त्यांच्याकडून बरेच शिकलो आहे. त्यांच्या आयुष्यात जर एखादी गोष्ट नेहमीच कायम राहिली असेल, तर ती म्हणजे लोकांविषयीचे प्रेम.

नरेंद्र मोदीपंतप्रधान

भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि आदरणीय नेते एम. व्यंकय्या नायडू गारू आज ७५ वर्षांचे होत आहेत. मी त्यांना दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. ज्या नेत्याचा जीवनप्रवास समर्पण आणि जनतेच्या सेवेप्रती अविचल बांधिलकीचे दर्शन घडवतो, अशा नेत्याचा सन्मान करण्याचा हा प्रसंग आहे. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ते उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळापर्यंत, व्यंकय्या गारू यांची कारकीर्द भारतीय राजकारणातील गुंतागुंतींना सहजतेने व विनम्रतेने हाताळण्याच्या त्यांच्या असामान्य क्षमतेचा दाखला देते. त्यांचे वक्तृत्व, विद्वत्ता व विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने असलेला भर यामुळे त्यांना सर्वच पक्षांकडून आदर प्राप्त झाला आहे.

आंध्र प्रदेशातील विद्यार्थी राजकारणातील एक विद्यार्थी नेते म्हणून सक्रीय झाल्यावर विविध प्रश्नांवर सक्रीय राहण्याची त्यांची वाटचाल सुरू झाली आणि राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. त्यांची प्रतिभा, वक्तृत्व आणि संघटनात्मक कौशल्ये लक्षात घेता, कोणत्याही राजकीय पक्षात त्यांचे स्वागतच झाले असते, परंतु ते 'राष्ट्र प्रथम' या दृष्टिकोनातून प्रेरित असल्याने त्यांनी संघ परिवारासोबत काम करण्यास प्राधान्य दिले. रा. स्व.संघ, अभाविपसोबत काम केले आणि त्यानंतर त्यांनी जनसंघ आणि भाजपाला बळकट केले.

ज्यांनी व्यंकय्या गारू यांना बोलतांना ऐकले असेल त्यांना त्यांच्या वक्तृत्वकौशल्याचा प्रभाव जाणवला असेल. ते शब्दप्रभू आहेतच, तितकेच ते कार्यप्रभूही आहेत. युवा आमदार असल्यापासून त्यांनी लोकांच्या समस्यांना आवाज दिला. एनटीआर यांच्यासारखे दिग्गजही प्रभावीत होते आणि त्यांनासुद्धा व्यंकय्या त्यांच्या पक्षात यावेत असे वाटत होते, मात्र मूळ विचारधारेपासून व्यंकय्या गारू यांनी  विचलित होण्यास नकार दिला. आंध्र प्रदेशात भाजपाला बळकट करण्यात, पक्षाला गावोगावी पोहोचवण्यात व सर्व स्तरातील लोकांना सामावून घेण्यात मोठी भूमिका बजावली.

१९९० मध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने व्यंकय्या गारुंच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि १९९३ मध्ये पक्षाच्या अखिल भारतीय सरचिटणीस पदावर त्यांची नेमणूक केली  त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या वाटचालीचा प्रारंभ झाला. एक किशोरवयीन, जो एके काळी अटलजी व अडवाणीजींच्या दौऱ्यांच्या घोषणा करत लोकांना माहिती देत फिरत असायचा, त्यांच्यासोबत आता थेट काम करण्याची संधी देणारा हा क्षण त्या व्यक्तीच्या आयुष्यातील खरोखरच एक उल्लेखनीय क्षण होता.

सरचिटणीस म्हणून आपल्या पक्षाला सत्तेवर कसे आणता येईल आणि देशाला भाजपाचा पहिला पंतप्रधान मिळेल यावर त्यांचा भर होता. दिल्लीमध्ये प्रवेश झाल्यावर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यापर्यंत त्यांनी आगेकूच केली. त्यानंतर त्यांनी केंद्रात मंत्रिपदेही यशस्वीपणे सांभाळली आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कोणीच नव्हता.  मंत्रीपद व खासदारकीचा राजीनामा देतानाचे त्यांचे भाषण कधीच विसरू शकत नाही.

उपराष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळल्यानंतरही  व्यंकय्या गारू हे सार्वजनिक जीवनात  सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांचे जिव्हाळ्याचे विषय तसेच देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींबाबत ते मला फोन करतात आणि त्याविषयी जाणून घेतात. आमचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर मी त्यांना भेटलो. ते आनंदित झाले. . त्यांच्या या कारकिर्दीसाठी त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो.  मला आशा आहे की युवा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व सेवेची आवड असलेले सर्वजण त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ती मूल्ये आत्मसात करतील. त्यांच्यासारखे लोकच आपल्या देशाला अधिक चांगले आणि चैतन्यशील बनवतात.

 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूNarendra Modiनरेंद्र मोदी