शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

"मी अनेकदा 'रामलला'समोर रडलो..."; आचार्य सत्येंद्र दास यांनी ३२ वर्षांआधीची सांगितली गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:45 IST

प्रमुख आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या तंबूत राहण्यापासून ते भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापर्यंतच्या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याचदरम्यान रामललाचे प्रमुख आचार्य सत्येंद्र दास यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रमुख आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या तंबूत राहण्यापासून ते भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापर्यंतच्या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत.

आचार्य सत्येंद्र दास गेल्या ३२ वर्षांपासून रामललाची पूजा करत आहेत. १९९२ मध्ये बाबरी पाडण्यापूर्वी सुमारे नऊ महिने ते रामललाची पुजारी म्हणून पूजा करत होते. बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा आचार्य सत्येंद्र दास तिथे उपस्थित होते. त्यानंतर एका तंबूत रामलला विराजमान होते. यावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागला, असं सत्येंद्र दास यांनी सांगितले.

रामललाची ही अवस्था भक्तांसाठी अत्यंत क्लेशदायक होती, परंतु कायदेशीर बंधनांमुळे भाविक इच्छा असूनही काही करू शकत नव्हते. मी अनेकदा रामललासमोर रडत असे, असं सत्येंद्र दास म्हणाले. तसेच आता रामनगरीत सौभाग्याचा नवा सूर्य उगवत आहे. भव्य मंदिरात रामललाला विराजमान झालेले पाहण्याचा उत्साह इतका आहे की तो शब्दात व्यक्त करता येणार नाही, अशी भावना देखील सत्येंद्र दास यांनी व्यक्त केल्या आहेत. 

राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नाही-

भाजपकडून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना सत्येंद्र दास यांनी म्हटलं की, "भाजपकडून भगवान रामाच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या पंतप्रधानांचा सगळीकडेच सन्मान होत असतो. त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नसून भक्ती आहे," असं दास यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या