शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

मला या देशातील विद्वेषाचे वातावरण संपवायचे आहे..., काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 08:59 IST

Rahul Gandhi: देशातील विद्वेषाचे वातावरण संपविण्याची आवश्यकता असून त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्रात सरकारचा पराभव करणे  आवश्यक आहे, असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. 

हैदराबाद - देशातील विद्वेषाचे वातावरण संपविण्याची आवश्यकता असून त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्रात सरकारचा पराभव करणे आवश्यक आहे, असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. 

तेलंगणातील नामपल्ली येथे प्रचारसभेत ते म्हणाले की, मी केंद्र सरकारविरोधात देत असलेल्या लढ्यामुळे माझ्यावर विविध राज्यांमध्ये २४ खटले दाखल करण्यात आले. त्या खटल्यांसंदर्भात मला न्यायालयांकडून नेहमी समन्स येत असतात.बदनामीच्या खटल्यात मला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. माझे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. केंद्र सरकारने माझे शासकीय निवासस्थानही काढून घेतले. पण या गोष्टींनी मी अजिबात डगमगलो नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

ओवैसी यांच्यावर किती खटले आहेत?राहुल गांधी म्हणाले की, माझ्यामागे ईडी, सीबीआयसहित अन्य सरकारी यंत्रणांचा भुंगा लागलेला असतो. मात्र ओवैसी यांची एका तरी सरकारी यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे का, असा सवाल त्यांनी केला. 

सोनिया यांचा व्हिडीओ संदेश - तेलंगणात काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केले. त्यांनी सांगितले की, उत्तम व प्रामाणिक सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे. - त्यासाठी मतदारांनी काँग्रेसला विजयी करावे. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष प्रयत्नशील असणार आहे, असेही सोनिया गांधी आपल्या दोन मिनिटांच्या व्हिडीओ संदेशात म्हटले.

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३