शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

मला या देशातील विद्वेषाचे वातावरण संपवायचे आहे..., काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 8:59 AM

Rahul Gandhi: देशातील विद्वेषाचे वातावरण संपविण्याची आवश्यकता असून त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्रात सरकारचा पराभव करणे  आवश्यक आहे, असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. 

हैदराबाद - देशातील विद्वेषाचे वातावरण संपविण्याची आवश्यकता असून त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्रात सरकारचा पराभव करणे आवश्यक आहे, असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. 

तेलंगणातील नामपल्ली येथे प्रचारसभेत ते म्हणाले की, मी केंद्र सरकारविरोधात देत असलेल्या लढ्यामुळे माझ्यावर विविध राज्यांमध्ये २४ खटले दाखल करण्यात आले. त्या खटल्यांसंदर्भात मला न्यायालयांकडून नेहमी समन्स येत असतात.बदनामीच्या खटल्यात मला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. माझे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. केंद्र सरकारने माझे शासकीय निवासस्थानही काढून घेतले. पण या गोष्टींनी मी अजिबात डगमगलो नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

ओवैसी यांच्यावर किती खटले आहेत?राहुल गांधी म्हणाले की, माझ्यामागे ईडी, सीबीआयसहित अन्य सरकारी यंत्रणांचा भुंगा लागलेला असतो. मात्र ओवैसी यांची एका तरी सरकारी यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे का, असा सवाल त्यांनी केला. 

सोनिया यांचा व्हिडीओ संदेश - तेलंगणात काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केले. त्यांनी सांगितले की, उत्तम व प्रामाणिक सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे. - त्यासाठी मतदारांनी काँग्रेसला विजयी करावे. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष प्रयत्नशील असणार आहे, असेही सोनिया गांधी आपल्या दोन मिनिटांच्या व्हिडीओ संदेशात म्हटले.

 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३