शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

"मला फटकारलं गेलं...", भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:52 IST

"...जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही."

भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा खासदार तथा प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत यांनी पक्षाकडून मिळालेल्या सल्ल्यावर मौन सोडले आहे. कंगना रणौत यांनी नुकतेच शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली उपद्रवी लोक हिंसाचार पसरवत होते. तसेच तेथे बलात्कार आणि हत्या होत होत्या, असे कंगना यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्या या विधानाशी भाजपने असहमती दर्शवत त्यापासून स्वतःला दूर ठेवले होते.

इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत कंगना म्हणाल्या, "मला पक्ष नेतृत्वाने फटकारले आणि मला यात कोणतीही अडचण नाही. मी पक्षाचा शेवटचा आवाज आहे, असे मला वाटत नाही. असे मानायला मी एवढी वेडी अथवा मूर्खही नाही. मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला वाटते, जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही."

शेतकरी आंदोलनासंदर्भात काय म्हणाल्या होत्या कंगना? -भाजपच्या हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या होत्या, "शेतकरी आंदोलनाच्या काळात काय घडले, हे ससर्वांनीच बघितले आहे. आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावली गेली. तेथे बलात्कार होत होते. लोकांना मारून फासावर लटकावले जात होते. सरकारने जेव्हा तीन कृषि कायदे मागे घेतले, त्यावेळी सगळ्या उपद्रवी आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचे नियोजन खूप दीर्घकाळाचे होते."

अशी होती भाजपची भूमिका -कंगना रणौत यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंह ग्रेवाल यांनी कंगना रणौतच्या विधानाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, "शेतकऱ्यांबद्दल बोलणे हे कंगना यांचे काम नाही. कंगना यांचे हे वैयक्तिक विधान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या बाजूने आहेत. कंगना रणौत यांनी अशी विधाने करू नये. असे बोलणे टाळायला हवे.", अशी भूमिका ग्रेवाल यांनी मांडली होती.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाFarmerशेतकरी