शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

'मी सरकारपुढे हात जोडणार नाही, कोर्टात जाणार अन्...'; खासदार वरुण गांधींचा पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 17:57 IST

वरुण गांधींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, जर शेतकर्‍यांच्या मुद्द्यात भ्रष्टाचार झाला तर सरकारसमोर हात जोडणार नाही, थेट न्यायालयात जाणार.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून भाजप खासदार वरुण गांधी शेतकरी कायद्यावरुन आपल्या सरकारवर टीका करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत आपल्या मतदारसंघातील पीक खरेदीत कोणत्याही प्रकारची अनियमितता ठेवणार नसल्याचे म्हटले आहे. 

नवीन कृषी कायदे आणि यूपी सरकारवर सातत्याने केलेल्या टीकेमुळे वरुन गांधी यांना पक्षाच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. आता वरुण यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, जर शेतकर्‍यांच्या मुद्द्यांमध्ये भ्रष्टाचार झाला तर सरकारसोबत हातमिळवणी करणार नाही, थेट कोर्टात जाणार. हा व्हिडिओ शेअर करताना वरुण गांधी यांनी लिहिले की, “जोपर्यंत एमएसपीची वैधानिक हमी मिळत नाही तोपर्यंत अशा मंडईंमध्ये शेतकऱ्यांचे शोषण होतच राहील. यावर कठोर कारवाई व्हायला हवी."

कर्मचाऱ्यांना इशारा

याच व्हिडिओमध्ये वरुण गांधी एका मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा इशारा देताना दिसत आहेत. मध्यस्थांचा उल्लेख करून ते म्हणाले, ''आम्ही प्रत्येक गोष्टीत निमित्त शोधता. ओलावा, तुटणे, काळेपणा असे सबब सांगून तुम्ही पिके नाकारता. तुम्ही हेच पीक  तुमच्या मित्रांना आणि इतर मध्यस्थांना 11-1200 ला विकता आणि इतरांना 1940 मध्ये विकता. आतापासून माझा एक प्रतिनिधी राहील आणि प्रत्येक प्रमुख खरेदी केंद्रावर लक्ष ठेवेल. तुम्ही लोकांनी भ्रष्टाचार केला किंवा शेतकर्‍यांवर अन्याय केला तर मी सरकारसमोर हातपाय जोडणार नाही, मी थेट कोर्टात जाऊन तुम्हा सर्वांना अटक करेन,''असा इशाराच वरुण गांधींनी दिला.

याआधीही वरुण गांधी यांनी लखीमपूर जिल्ह्यातील बाजारपेठेत शेतकऱ्यांचे पीक जाळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला होता. शनिवारी वरुण गांधी यांनी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले, "उत्तर प्रदेशातील समोध सिंह, शेतकरी गेल्या 15 दिवसांपासून आपले पीक विकण्यासाठी मंडईत चकरा मारत होते, हे विकले गेले नाही तेव्हा निराश होऊन आपल्याच पीकाला आग लावली. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना कुठे आणले आहे? कृषी धोरणाचा पुनर्विचार करणे ही काळाची गरज आहे. यापूर्वी अनेकदा वरुण गांधी यांनी कृषी कायद्यांबाबत भाष्य केलं आहे.

 

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश