शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...तर वाराणसीतून निवडणूक लढविण्यास तयार - प्रियंका गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 17:49 IST

वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

वायनाड : वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही वाराणसी मतदार संघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवतील असे, संकेत दिले आहेत. मात्र, आज प्रियंका गांधी यांनी स्वत: वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढविण्याची संधी भेटली तर आपल्याला आनंद होईल, असे म्हटले आहे.   

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी वायनाडमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मला वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढविण्यास सांगितले, तर मला खूप आनंद होईल', असे यावेळी प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून अद्याप वाराणसी मतदारसंघासाठी कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. मात्र, या मतदार संघातील कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे.   

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्षामध्ये गंभीरपणे विचार सुरु आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल अशा अन्य नावांबाबतही चर्चा सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार म्हणून या नावाला संमती मिळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. 

वेगळे निकाल शक्यया मतदारसंघात रोहनिया, वाराणसी (उत्तर), वाराणसी (दक्षिण), सेवापुरी आणि बनारस कॅण्टॉनमेंट हे पाच विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. २०१४च्या निवडणुकीमध्ये इथे मोदी यांना ५६.३६ टक्के मते मिळाली होती. तर कॉँग्रेस-सपा आघाडीला ७.३३ टक्के, बसपाला ५.८७ टक्के तर आम आदमी पार्टीला २०.२९ टक्के मते मिळाली होती. यंदा कोणतीही लाट नसल्याने कॉँग्रेस उमेदवाराला सर्व विरोधकांचा पाठिंबा मिळाल्यास वेगळे चित्र दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीVaranasiवाराणसीvaranasi-pcवाराणसीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी