शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

दलितांना हत्यारे दिली असती तर देशावरील आक्रमण रोखता आलं असत - आरएसएस

By admin | Published: April 13, 2016 9:46 AM

भारतीय समाजातील अनेक घटकांना आणि मुख्यत: दलितांना लढण्याची परवानगी न दिल्याने परकीय आणि मुस्लिम अतिक्रमण करण्यात यशस्वी झाले असं आंबेडकरांचं म्हणण होतं असा दावा आरएसएसने केला आहे

ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १३ - 'भारतीय समाजातील अनेक घटकांना आणि मुख्यत: दलितांना लढण्याची परवानगी न दिल्याने परकीय आणि मुस्लिम अतिक्रमण करण्यात यशस्वी झाले', असं आंबेडकरांचं म्हणण होतं असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केला आहे. आरएसएसने मुखपत्र ऑर्गनायझर मधून हा दावा केला आहे. 'जर अस्पृश्यांना हत्यारांपासून वंचित ठेवलं नसत तर देशावर परकीय शक्तीने राज्य केलं नसत', असं आंबेडकरांनी म्हंटल्याच आरएसएसने सांगितलं आहे. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आंबेडकरांबद्दलची आपली आस्था सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिमांच अतिक्रमण रोखण्यासाठी आंबेडकरांचा काय दृष्टीकोन होता हे सांगण्याचा प्रयत्न आरएसएसने केला आहे. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने आरएसएसने आंबेडकरांच्या लढ्यापासून ते योगदानापर्यंतची माहिती मुखपत्रात छापली आहे.
 
आरएसएसने आंबेडकरांच्या आयुष्याची माहिती दोन भागांत विभागली आहे. पहिल्या भागात आंबेडकर समाज आणि देशासाठी कसे जगले याबद्दल सांगण्यात आलं आहे. तर दुस-या भागात देशाचा विकास, सुरक्षा, एकता याबद्दलचे त्यांचे विचार मांडण्यात आले आहेत.  
आरएसएसने डावे पक्ष आणि काही मुस्लिम संघटनांवर टीका करत आंबेडकरांच्या नावाचा फायदा घेत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे हिंदूंना बळकट करण्यासाठी तसंच दलितांनी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करु नये यासाठी आरएसएस हा प्रयत्न करत असल्याचं मत काही तज्ञांनी दिलं आहे.