शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
3
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
4
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
5
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
6
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
7
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
8
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर मुलीचा जीव वाचला असता - हेमामालिनी

By admin | Published: July 08, 2015 10:20 AM

त्या मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघात टळला असता व चिमुकलीचे प्राण वाचले असे सांगत हेमामालिनी यांनी अपघातासाठी त्याच कुटुंबाला जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ - राजस्थानमधील दौसा येथे झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री व खा. हेमामालिनी यांनी या अपघातासाठी त्या कुटुंबालाच जबाबदार ठरवले आहे. 'त्या मुलीच्या वडिलांनी जर वाहतुकीचे नियम पाळले असते तर एका चिमुरडीचा जीव वाचला असता' असे ट्विट करत हेमामालिनी यांनी अपघाताचे खापर त्या कुटुंबावरच फोडले आहे. 

गेल्या आठवड्यात हेमामालिनी आग्रा येथून जयपूरला जात असताना दौसा येथे त्यांच्या मर्सिडीजने अल्टो कारला उडवले. या धडकेत अल्टो कारमधील चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला तसेच हेमामालिनींसह पाच  जखमी झाले. हेमामालिनी यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार करण्यात आले.
प्रकृती सुधारल्यानंतर हेमामालिनी यांनी ट्विटरवरून त्या अपघाताचे खापर मृत मुलीच्या कुटुंबियांवरच फोडले. 'या अपघातात हकनाक जीव गमवावा लागलेल्या त्या चिमुरडीसाठी व अपघातातील जखमींसाठी मला  वाईट वाटते. जर त्या चिमुरडीच्या वडिलांवनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघाता टळला असता आणि त्या चिमुकल्या बालिकेचे प्राणही वाचले असते' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणा-या चाहत्यांचे आभार मानत आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणारी मीडिया व इतर काही लोकांवरही हेममालिनी यांनी जोरदार टीका केली. 
दरम्यान या अपघाताप्रकरणी हेमामालिनी यांच्या कारचालकाविरोधात अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.