शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

सरकारला अस्थिर, तर मला बदनाम करण्याचा डाव

By admin | Published: February 22, 2016 3:43 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंतुष्ट एनजीओ आणि काळाबाजार करणाऱ्यांवर टीका करीत आरोप केला की, सरकारला अस्थिर तर मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे.

बारगढ (ओडिशा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंतुष्ट एनजीओ आणि काळाबाजार करणाऱ्यांवर टीका करीत आरोप केला की, सरकारला अस्थिर तर मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे. मात्र, अशा कारस्थानांना न जुमानता मी माझे काम करीत राहणार आहे, असे ते म्हणाले. छत्तीसगढच्या दौऱ्यानंतर ओडिशात बारगढ येथे एका शेतकरी मेळाव्यात बोलताना मोदी म्हणाले की, काही लोक आणखीही हे वास्तव स्वीकारायला तयार नाहीत की, एक चहावाला इसम देशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळेच या इसमाला बाजूला करण्यासाठी हे लोक कारस्थान करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

गरिबांसाठी पाच कोटी घरेरायपूर : गरिबांसाठी २०२२ पर्यंत पाच कोटी घरे बांधणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायपूर येथे रविवारी ‘प्रधानमंत्री आवास योजने’ची कोनशिला बसविताना केली. त्यांनी छत्तीसगडच्या डोंगरगड येथे देशभरातील ३०० गावांच्या विकासासाठी ‘रर्बन मिशन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले. या गावांना विकास केंद्र मानून शहरांप्रमाणे नियोजन केले जाणार असल्याचे सांगतानाच त्यांनी माझे सरकार गरीब, दलित, आदिवासी आणि समाजातील अन्य दुर्बल घटकांसाठी कार्य करीत असल्याची ग्वाहीही दिली. सरकारने गरिबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत, रर्बन मिशन यासारख्या विविध योजना आणल्या आहेत. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि केंद्रीय नगरविकासमंत्री वीरेंद्रसिंग उपस्थित होते. पैशाचा तपशील मागताच एनजीओ दुखावले गेले मोदी म्हणाले की, एनजीओ विदेशातून पैसा मिळवीत आहेत आणि सरकार त्याबाबतचा हिशेब मागत आहे. तथापि, जेव्हापासून आम्ही या पैशांचा तपशील मागणे सुरू केले आहे तेव्हापासून सगळे एकजूट झाले आहेत आणि म्हणत आहेत की, ‘मोदींना मारा, ते आम्हाला हिशेब मागत आहेत.’ देशाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे की, जो पैसा आला तो खर्च कुठे झाला? अर्थात, हे कायद्यातच आहे. सर्व एनजीओ आता एकत्र आले आहेत आणि कारस्थान करीत आहेत की, मोदींना कसे संपविता येईल? सरकारला कसे हटविता येईल? आणि मोदींना बदनाम कसे करता येईल? या देशातील आजारावरच्या उपचारासाठी जनतेने मला निवडले आहे. त्यामुळे थांबणार नाही, थकणार नाही आणि झुकणारही नाही. मोदी म्हणाले की, मी जाणून आहे की, विरोधकांना नेमके काय खुपत आहे? मात्र, मी देशाला लुटण्याची आणि बरबाद करण्याची परवानगी देऊ शकत नाही. कशी असेल रर्बन मिशन योजनाचार लगतच्या गावांचा नगरसमूह म्हणून विकास करताना अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जातील. अशा ३०० ग्रामीण केंद्रांची उभारणी केली जाईल.दरवर्षी १०० केंद्रांचा विकास केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. गावांचा अशा पद्धतीने विकास केल्यास आयुष्याच्या स्तरात खूप मोठा बदल घडून येईल.