शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झाले तर...; जगाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 16:28 IST

भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान फाळणीपासूनच तणावाचे संबंध आहेत. तर दोन्ही देशांदरम्यान चार वेळा युद्ध झाले आहे. सर्व युद्धांत पाकिस्तानचा पराभव झाला असला तरीही युद्धाची खुमखुमी काही कमी झालेली नाही. काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढत 370 कलम हटविल्याने भारतालाअणुयुद्धाची धमकी देण्यात येत आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर युनोमध्ये याचा उच्चार केला होता. यावर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी या युद्धाचे परिणाम काय होतील याचा अहवाल दिला आहे. 

भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे. भारत अण्वस्त्र सज्ज असला तरीही पाकिस्तानकडून हल्ला झाल्यासच अण्वस्त्रे वापरण्याची भुमिका वेळोवेळी घेत आला आहे. पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत, परंतू भारताकडील अण्वस्त्रांची संख्या पाहता ती खूपच कमी आहेत. सैन्य दलाच्या बाबतीतही पाकिस्तान खूप मागे आहे. या पार्श्वभुमीवर भारत-पाकिस्तानदरम्यान चर्चा बंद झालेली आहे. 

पाकिस्तानच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे. जर दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध झाले तर तब्बल 12.5 कोटी लोक मारले जातील. याचबरोबर जगालाही याचे चटके सोसावे लागतील. जगभरात उपासमारीची वेळ येईल. अमेरिकेच्या रटगर्स विद्यापीठाचे अभ्यासकर्ते एलन रोबक यांनी सांगितले की, जर आण्विक युद्ध झाले तर ते कोणत्या खास जागेवर होणार नाही, अणू बॉम्ब कुठेही पडू शकतात. या देशांदरम्यान 2025 मध्ये युद्ध होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. 'सायन्स अॅडव्हान्सेस'मध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. 

अणुहल्ल्य़ांमुळे 16 ते 36 हजार कोटी किलो कार्बन मिश्रित धुरळा उठणार आहे. हा धुरळा वायुमंडळाच्या वरच्या स्तरामध्ये पसरणार आहे. दोन्ही देशांकडे जवळपास 400 ते 500 अण्वस्त्रे असतील. या धुरळ्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर येणार नाहीत. यामुळे तापमान 2 ते 5 अंशावर जाईल आणि पाऊसही 20 टक्क्यांनी कमी होईल. याचा अत्यंत वाईट परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.  

टॅग्स :nuclear warअणुयुद्धPakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिकाArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर