शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

जयललिता असत्या तर धाड टाकायची हिंमत झाली असती का ? - पी रामा मोहन राव

By admin | Published: December 27, 2016 3:50 PM

आयकर विभागाने घरावर धाड टाकल्यानंतर पदावरुन हटवण्यात आलेले तामिळनाडूचे सचिव पी रामा मोहन राव यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 27 - आयकर विभागाने घरावर धाड टाकल्यानंतर पदावरुन हटवण्यात आलेले तामिळनाडूचे सचिव पी रामा मोहन राव यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. 'टाकण्यात आलेली धाड ही घटनेविरोधात जाऊन करण्यात आलेला अत्याचार असल्याचं', त्यांनी म्हटलं आहे. 'केंद्र सरकार राज्य प्रशासनाचा काही आदर करत नाही. राज्य सरकार आहे कुठे ?', असा सवालही त्यांनी विचारला आहे. 
 
आपल्या बदलीचा निषेध करत बोलताना 'या राज्य सरकारमध्ये मला बदलीची ऑर्डर देण्याची हिंमत नाही. मला अजूनपर्यंत अशी कोणतीच ऑर्डर मिळालेली नाही', असं म्हटलं आहे. 'मी अजूनही सचिव असून माझी नियुक्ती जयललितांनी केली होती', असं सांगत आपण कोणत्याही दबावाखाली झुकणार नसल्याचं सांगितलं आहे. माझ्यामुळे राज्यात भूकंप येऊ शकतो. माजी मुख्यमंत्री जयललिता जिवंत असत्या तर ही धाड टाकण्याची हिंमत झाली असती का ? असा सवाल पी रामा मोहन राव यांनी विचारला आहे.
 
'जयललितांच्या अनुपस्थितीत राज्यात काहीच सुरक्षित नाही आहे. जर माझ्यासोबत असं होऊ शकतं, तर मग अण्णाद्रुमूकच्या बाकीच्या शिलेदारांचं काय होणार ?', असंही ते बोलले आहेत. 'जर आयकर विभागाला मुख्य सचिवांच्या घरावर धाड टाकायची होती तर त्यांनी राज्य सरकारला प्रथम पदावरुन हटवण्य़ास सांगणं गरजेचं आहे. धाड टाकण्याआधी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. पण मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेण्यात आलं होतं की नव्हतं माहिती नाही', असं सांगितलं आहे. माझा अडथळा होत असल्याने माझ्यावर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.