शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

'मसूदला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईकची गरज नव्हती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 02:39 IST

दिग्विजय सिंह यांचा प्रज्ञासिंह यांच्यावर निशाणा; पठाणकोट, पुलवामा हल्ले का रोखले नाही?

भोपाळ : पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरलाही शाप दिला असता, तर भारतीय लष्कराला सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती, असा टोला लगावत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला.

भोपाळ येथील अशोका गार्डन्स येथे प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, भारतासाठी प्राणाची आहुती देणारे एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांचा सर्वनाश होईल, असा मी शाप दिला होता, असे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले होते. मसूद अजहरलाही त्यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती.

आम्ही पाताळातही शोधून दहशतवाद्यांना मारू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात; परंतु पुलवामा, पठाणकोट आणि उरी येथे दहशतवादी हल्ले झाले तेव्हा ते कुठे होते? हे दहशतवादी हल्ले का रोखता आले नाहीत? असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधानांवरही टीका केली.

काँग्रेसने भोपाळमधून माझी उमेदवारी घोषित केल्यानंतर ‘मामा’ जाम घाबरले आहेत. प्रकृती ठीक नाही, असे सांगून गौर यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी भाजपने प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी घोषित केली. 

धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहाहिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन भाऊ-भाऊ आहेत. हे लोक असे म्हणतात की, हिंदू धोक्यात असल्याने हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. ५०० वर्षे मुस्लिमांची देशात सत्ता होती तेव्हा कोणत्याही धर्माचे नुकसान झाले नाही. धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. आमच्या धर्मात ‘हर हर महादेव’ असा जयघोष करतो; परंतु भाजप ‘ हर हर मोदी’ नारा देत आहेत, त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019