शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

...तर 22 वर्षापूर्वीच पाक झाला असता अण्वस्त्रहीन

By admin | Published: January 30, 2017 1:09 PM

भारतीय हवाई दल त्यावेळी मिग-29 लढाऊ विमान ताफ्यात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होते. अमेरिकेच्या एफ-16 पेक्षा मिग-29 अधिक अत्याधुनिक होते.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय हवाई दलाने 1984 साली पाकिस्तानच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला करण्याची तयारी केली होती अशी माहिती सीआयएच्या गोपनीय कागदपत्रातून समोर आली आहे. सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने त्यावेळी मिळवलेल्या माहितीमधून तसा निष्कर्ष काढला होता. 
 
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सीआयएने गुप्चर माहितीचे विश्लेषण करुन हा निष्कर्ष काढला होता.  भारताने असा हल्ला चढवला असता तर पाकिस्तानचे अणवस्त्र प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले असते किंवा मोठया प्रमाणावर हानी पोहोचवून अनेक वर्षापर्यंत पाकिस्तानला अणवस्त्र तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता आले असते. 
 
भारतीय हवाई दल त्यावेळी मिग-29 लढाऊ विमान ताफ्यात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होते. अमेरिकेच्या एफ-16 पेक्षा मिग-29 अधिक अत्याधुनिक होते. पाकिस्तानकडे त्यावेळी एफ-16 लढाऊ विमाने होती. सीआयएनुसार काहुता आणि पीनस्टेच असे ते दोन प्रकल्प होते. 
 
विमानाने भारतापासून अर्ध्यातासाच्या अंतरावर हे दोन्ही प्रकल्प होते. त्यावेळी पाकिस्तानपेक्षा भारतीय हवाई दल अधिक सामर्थ्यवान आणि सशक्त होते. भारताने असा हल्ला केला असता तर पाकिस्तानला आपल्या प्रकल्पाचे रक्षण करता आले नसते असा सीआयएचा निष्कर्ष होता.