शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

INDIA आघाडीत घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण केल्या तर काँग्रेसकडे उरणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:35 AM

इंडिया आघाडीत जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरु असताना काँग्रेस पक्ष त्याग करण्यासाठी तयार झाली आणि सर्व घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण केल्या तर काँग्रेसकडे काय राहणार? हा मुद्दा आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात सत्ताधारी एनडीए आघाडी भाजपाच्या नेतृत्वात अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा करण्याची तयारीत आहे. तर विरोधी इंडिया आघाडीत अद्याप जागावाटपावरून तिढा सुटलेला नाही. इंडिया आघाडीत राज्यांपासून दिल्लीपर्यंत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दररोज बैठका घेतल्या जात आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. परंतु यूपी आणि बिहारपासून पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल? याचे उत्तर अद्याप मिळाले नाही. 

विविध राज्यात वेगवेगळ्या पक्षांचा आपापला फॉर्म्युला आहे. प्रत्येकाच्या मागण्या आहेत. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील आरजेडी असेल अथवा नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष, दोघेही जागावाटपात तडजोड करायला तयार नाहीत. यूपीत समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनीही जागांची संख्या ठाम सांगितली आहे. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटही २३ जागांसाठी आग्रही आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असणाऱ्या आप पक्षाने गोवा, गुजरात आणि हरियाणात काँग्रेस पक्षाशी बोलणी सुरू केलीत. 

इंडिया आघाडीत जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरु असताना काँग्रेस पक्ष त्याग करण्यासाठी तयार झाली आणि सर्व घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण केल्या तर काँग्रेसकडे काय राहणार? हा मुद्दा आहे. यूपीत इंडिया आघाडीचे नेतृत्व समाजवादी पार्टी करेल असं अखिलेश यादवनं स्पष्ट केलंय. एकीकडे सपाने काँग्रेससोबत बोलणी सुरू केलीत तर दुसरीकडे ६५ जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेस आणि सपा यांच्यात आघाडी झाली तर १५ लोकसभा जागांसाठी जयंत चौधरी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोक दललाही सोबत घ्यावे लागेल. जयंत चौधरी ६ जागांची मागणी करत आहेत. अशावेळी काँग्रेसला यूपीच्या ८० जागांपैकी केवळ ९ जागा शिल्लक राहतात. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट २३ जागांची मागणी करत आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपासोबत मैदानात उतरून शिवसेनेने २३ उमेदवार उभे केले होते. त्यातील १८ जागांवर विजय मिळाला. परंतु तेव्हा पक्ष मजबूत होता. त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागांवर विजय मिळाला होता. २०१९ मध्ये ज्या जागांवर ठाकरे गटाने उमेदवार उभे केले होते त्या जागा पुन्हा लढवण्यासाठी ते आग्रही आहेत. राष्ट्रवादीनेही १२ जागांची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही ४ जागांची मागणी केली आहे. राज्यात एकूण ४८ जागा असून काँग्रेसला सोडलं तर जवळपास ४० जागा घटक पक्ष मागत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस