शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

वक्फ कायदा योग्य असता तर मुस्लिम आज पंक्चर काढत बसला नसता; मोदींचे पहिल्यांदाच वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 13:47 IST

PM Modi on Waqf Bill: देशभरात मुस्लिम संघटनांकडून विरोध होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिल्यांदाच वक्फ विधेयकाच्या कायद्यात रुपांतर झाल्यावर वक्तव्य आले आहे

वक्फ विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळलेला असताना, देशभरात मुस्लिम संघटनांकडून विरोध होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिल्यांदाच वक्फ विधेयकाच्या कायद्यात रुपांतर झाल्यावर वक्तव्य आले आहे. मोदी यांनी आज हरियाणाच्या हिसार ते अयोध्या विमानसेवेचे उद्घाटन केले. यावेळी विमानतळावरच मोदी यांनी सभा घेतली.

देश स्वतंत्र झाल्यापासून २०१३ पर्यंत वक्फ बिल चालत होता. निवडणुकीत मते मिळावीत म्हणून २०१३ मध्ये काँग्रेसने त्यात बदल केला. कायदा असा बनविला की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पुरती वाट लावली. याचा योग्य वापर केला असता तर आज मुस्लिमांना सायकलच्या टायरच पंक्चर काढायची गरज राहिली नसती, असे मोदी म्हणाले. 

ते त्यांनी मुस्लिमांच्या हितासाठी केल्याचे काँग्रेस सांगत आहे. जर एवढीच काँग्रेसला खऱ्या मुस्लिमांबाबत आत्मियता आहे तर त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीला काँग्रेस अध्यक्ष बनवावे. पण यांचे नेते ते करणार नाहीत. या लोकांना फक्त देशाच्या नागरिकांचे अधिकार हिसकावून घ्यायचे आहेत, असे मोदी म्हणाले. 

काँग्रेसने आपल्या पवित्र संविधानाला सत्ता मिळवण्यासाठी एक शस्त्र बनवले आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसवर सत्तेचे संकट आले तेव्हा त्यांनी संविधान चिरडले आहे. संविधानाचा आत्मा असा आहे की प्रत्येकासाठी समान नागरी संहिता असावी, ज्याला मी समान नागरी संहिता (UCC) म्हणतो, परंतु काँग्रेसने ते लागू केले नाही. उत्तराखंडमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर, UCC मोठ्या आनंदाने लागू करण्यात आला. संविधान खिशात घेऊन बसलेले काँग्रेसचे लोक त्याचा विरोध करत आहेत, असा आरोप मोदी यांनी केला. 

काँग्रेस बाबासाहेबांसोबत कशी वागली हे आपण विसरता कामा नये. काँग्रेसने त्यांना दोनदा निवडणुकीत पराभूत करून अपमानित केले. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एससी, एसटी, ओबीसींचे पेन्शनमधील अधिकार हिसकावून घेतले आणि धर्माच्या आधारावर आरक्षण दिले आहे, अशी टीकाही मोदी यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwaqf board amendment billवक्फ बोर्ड