शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
शिवसेनेत आमदारकीच्या तिकीटासाठी २०-२० कोटींची मागणी; लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर गंभीर आरोप
3
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
4
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
5
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
6
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
7
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
8
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
9
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
10
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
11
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
12
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
13
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
14
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
15
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
16
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
17
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
18
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
19
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
20
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

दहशतवादाशिवाय दुसरा मुद्दा आल्यास पाकशी चर्चा नाही- सुषमा स्वराज

By admin | Published: August 22, 2015 5:19 PM

भारत व पाकदरम्यान एनएसए स्तरावर दहशतवाद या एका मुद्याशिवाय इतर कोणत्याही मुद्यावर (हुर्रियत नेते व जम्मू-काश्मीर) बोलायचे असल्यास पाकशी चर्चा होणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ -  भारत व पाकिस्तानदरम्यान एनएसए स्तरावर दहशतवाद या एकाच मुद्यावर चर्चा होऊ शकते, इतर कोणत्याही मुद्यावर (हुर्रियत नेते व जम्मू-काश्मीर) चर्चा करायची असल्यास दोन्ही देशांदरम्यान ही चर्चा होणार नाही, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला सुनावले आहे. भारताने पाकिस्तानसमोर कोणतीही अट ठेवली नसून दोन्ही देशांदरम्यान होणारी ही चर्चा शिमला व उफा करारानुसारच होईल असे स्पष्ट करत भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे केवळ आजची रात्र असल्याचे सांगितले असून आता पाकिस्तान यावर काय भूमिका घेते, सरताज अझिज भारतात येतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
२३ ऑगस्ट रोजी भारत पाकदरम्यान एनएसए स्तरावर चर्चा होणार असून काश्मीरचा मुद्दा वगळून दोन्ही देशांदरम्यान चर्चा होऊ शकत नाही असे पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज दुपारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेत आपण चर्चेसाठी पाकिस्तानचे स्वागत करतो, त्यांच्यासमोर कोणतीही अट ठेवली नसून सिमला व उफा करारांनुसारच चर्चा होईल असे सांगितले. 'उफा' येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार चर्चेतील अडथळा दूर करण्यासाठी दहशतावादाच्या मुद्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अझिज यांचे आम्ही स्वागत करतो, पण भारताशी चर्चेआधी त्यांनी हुर्रियतच्या नेत्यांची भेट घेणे हे 'सिमला' कराराचे उल्लंघन असल्याने आम्ही त्या भेटीला विरोध करतो. 'सिमला' करारानुसार भारत-पाकिस्तान चर्चेदरम्यान हुर्रियत किंवा इतर कोणालाही तिसरी पार्टी बनवू नका. ही चर्चा दोन देशांमध्येच झाली पाहिजे असे स्वराज म्हणाल्या. भारत-पाकदरम्यान होणारी चर्चा टाळण्यासाठी पाक प्रयत्न करत आहे, असा आरोपही स्वराज यांनी केला.
जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर चर्चा करण्यापासून भारत दूर पळत नाहीये, मात्र दहशतवाद व हिंसेतून मुक्तता मिळाल्याशिवाय, सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय काश्मीरच्या मुद्यावर चर्चा होऊ शकत नाही, असे स्वराज यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पाकिस्तानचा खोटेपणा उघड झालेला असताना भारताची या मुद्यावर काय भूमिका असेल असे विचारण्यात आले असता याप्रकरणीचे सर्व पुरावे केंद्र सरकार तपासून बघेल आणि त्यानंतर आवश्यकता वाटल्यास ही माहिती पुराव म्हणून पाकिस्तान सरकारला देऊ, असे स्वराज यांनी सांगितले.