शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

आज विवेकानंद असते तर त्यांच्यावरही गुंडांनी इंजिन ऑइल फेकलं असतं- थरुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 14:00 IST

झारखंडमध्ये स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

थिरुवनंतपूरम- 19 व्या शतकात जगभरात भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांबाबत जागृती करणारे आणि थोर विचारवंत स्वामी विवेकानंद आज असते तर त्यांच्यावरही गुंडांनी हल्ला केला असता असे विधान काँग्रेसचे नेते आणि थिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांनी केले आहे. झारखंडमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आणि अखिल भारीतय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर थरुर बोलत होते.

ज्याप्रमाणे अग्निवेश यांच्यावर हल्ला झाला तसाच आज स्वामी विवेकानंद असते तरी त्यांच्यावर या गुंडांनी हल्ला केला असता याची मला खात्री आहे असे थरुर म्हणाले. लोकांचा आदर करा, माणुसकी अधिक महत्त्वाची आहे असे विवेकानंदांनी आज सांगितले असते म्हणून या गुंडांनी इंजिन ऑइल त्यांच्यावर फेकलं असतं आणि अग्निवेश यांना रस्त्यात पाडलं तसंच त्यांच्याशीही वर्तन केलं असतं, अशा शब्दांमध्ये शशी थरूर यांनी अग्निवेश यांच्या हल्ल्याचा निषेध केला.

थरुर यांनी यावेळी गृहमंत्रालयाने जाहीर केलेली सांप्रदायिक हिंसाचाराची आकडेवारीही सांगितली. गेल्या चार वर्षांमध्ये सांप्रदायिक हिंसेच्या 2920 घटनांची नोंद झाली आहे. तसेच गायीच्या मुद्द्यावरून झालेल्या 70 खटल्यांपैकी 68 खटले भाजपाशासित राज्यांमध्ये नोंदले गेले आहेत.पंतप्रधान परदेशात गेल्यावर वेगवेगळे पोशाख घालतात मात्र ते हिरवा रंग मात्र परिधान करत नाहीत (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मुस्लीम टोपी घालण्यास नकार दिला होता.) अशा शब्दांमध्ये थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

दरम्यान स्वामी अग्निवेश यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यावर हल्ला होऊन 18 दिवस झाले तरिही झारखंड पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, या आठवड्यात आपण कधीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो असे अग्निवेश यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद