शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Amit Shah : "सत्यपाल मलिक म्हणाले ते सत्य असेल तर राज्यपाल असताना शांत का होते?" अमित शाहंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 1:13 PM

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या आरोपावर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलंय.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच पुलवामा हल्ल्यासह अनेक मुद्द्यांवर खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. यावरून देशात राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. यावरून विरोधी पक्षानंही सरकारवर सतत हल्लाबोल करत आहे. सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर त्यांना मिळालेल्या सीबीआय नोटीसबाबत प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका कार्यक्रमादरम्यान सत्यपाल मलिक यांच्यावर पलटवार केला. आमची साथ सोडल्यानंतरच त्यांना याची आठवण का येतेय? ज्यावेळी सत्तेत असतो त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. सत्यपाल मलिक यांच्या विश्वासार्हतेवर अमित शाह यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “जनतेनx याचा विचार करायला हवा. सत्यपाल मलिक यांचे म्हणणे योग्य असेल तर मग ते राज्यपाल असताना शांत का होते? सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल असताना या विषयावर बोलायला हवे होते. हे सर्व सार्वजनिक चर्चेचा विषय नाहीत,” असं ते आरोपांवर बोलताना म्हणाले. अमित शाह इंडिया टुडेच्या राऊंड टेबल या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केल.

जनतेनं मूल्यमापन करावं“मी देशातील जनतेला नक्कीच सांगू इच्छितो की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं लपविण्यासारखं कोणतंही काम केलेलं नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणी आपल्यापेक्षा वेगळे काही बोलत असेल तर त्याचं मूल्यमापन माध्यमांनीही करावं, जनतेनंही करावे. तुम्ही पदावर नसताना आरोपाचे मूल्य आणि मूल्यमापन दोन्ही घसरतं,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

राजकारणात असं घडतंजेव्हा तुम्ही सत्यपाल मलिक यांची राज्यपालपदी निवड केली तेव्हा तुम्ही चुकीची व्यक्ती निवडली असं तुम्हाला वाटलं नाही का? असा प्रश्न शाह यांना करण्यात आला. ते दीर्घकाळापासून पक्षासोबत आहेत. राजनाथ सिंह अध्यक्ष असताना ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते आणि आमच्या टीममध्येही होते. आता कोणी आपली भूमिका बदलतं, त्यावर आम्ही काय बोलू शकतो. राजकारणात असं घडत असतं,” असं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरHome Ministryगृह मंत्रालय