शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

परवानगी दिलीत मग तुम्हीच दंड भरा, श्री श्री रवीशंकर यांचा अजब तर्क

By admin | Published: April 20, 2017 1:05 PM

यमुना नदीच्या किना-यावर झालेल्या नुकसानासाठी परवानगी देणारं सरकार आणि न्यायालय जबाबदार असल्याचा अजब दावा श्री श्री रवीशंकर यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) न्यायालयाने श्री श्री रवीशंकर यांना खडे बोल सुनावत चांगलंच फटकारलं आहे. "तुम्हाला जबाबदारीची जराही जाणीव नाही. तुम्हाला काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे असं तुम्हाला वाटतं का ?", असा संतप्त सवाल न्यायालयाने विचारला. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या किना-यावर महोत्सव आयोजित केल्यामुळे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन होऊन झालेल्या नुकसानासाठी परवानगी देणारं सरकार आणि न्यायालय जबाबदार असल्याचा अजब दावा श्री श्री रवीशंकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुनच न्यायालयाने नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारलं. 
 
"जर का दंड वसूल करायचाच असेल तर तो कार्यक्रमासाठी परवानगी देणा-या केंद्र, राज्य सरकार आणि राष्ट्रीय हरित लवादाकडून केला पाहिजे. जर का यमुना इतकीच नाजूक आणि शुद्ध आहे तर त्यांनी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाला परवानगीच द्यायला नको होती", अशी पोस्ट श्री श्री रवीशंकर यांनी फेसबूकवर केली होती.
 

‘प्रसंगी कारागृहात जाण्याची माझी तयारी राहील. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) ठोठावलेला एक रुपयाचाही दंड देणार नाही,’ या शब्दांत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी आव्हान दिले होते. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर महोत्सव आयोजित केल्यामुळे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल लवादाने ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.