शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

‘‘आपण बिहार-बंगालवर कब्जा कराल तर आम्ही काय लॉलीपॉप खाणार का"? ममतांनी बांगलादेशला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 18:52 IST

“जेव्हा बाह्य शक्ती भारताच्या भूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा आम्ही बसून काय लॉलीपॉप खाणार का?"

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, बंगाल, बिहार आणि ओडिशावर आपला वैध दावा असल्याच्या बांगलादेशी नेत्यांच्या विधानावर सोमवारी आश्चर्य व्यक्त करत निशाणा साधला आहे. “जेव्हा बाह्य शक्ती भारताच्या भूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा आम्ही बसून काय लॉलीपॉप खाणार का?" असा प्रश्न त्यांनी केला आहे.

ममता यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभेत लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले, तसेच बांगलादेशात केल्या जाणाऱ्या विधानांवर आक्रोशित न होण्याचे आवाहन करत, पश्चिम बंगाल नेहमीच केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या कुठल्याही निर्णयासोबत उभा राहील, असे म्हटले आहे. तसेच, ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच बांगलादेशातील काही नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांची खिल्ली उडवत, "शांत राहा, निरोगी राहा आणि मानसिक शांतता राखा," असे म्हटले आहे.

प्रक्षोभक विधानांकडे दुर्लक्ष करा -बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) नुकतेच ढाका येथील एका जाहीर सभेत, बंगाल, बिहार आणि ओडिशावर देशाचा वैध दावा असल्याचे म्हटले होते. यानंतर, पश्चिम बंगालच्या जनतेने शांत राहावे आणि बांगलादेशात काही लोकांकडून होणाऱ्या प्रक्षोभक विधानांमुळे प्रभावित होऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. याशिवाय, आपल्या राज्यात, इमामांनीदेखील बांगलादेशातील अल्पसंख्यकांविरोधात होणाऱ्या विधानांचा आणि हल्ल्यांचा निषेध केला असल्याचेही त्या म्हणाल्या.

ममता सरकार परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल -मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या, "आपले सरकार आणि तृणमूल काँग्रेस पक्ष परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल आणि पूर्वसूचनेशिवाय कुठलेही भाष्य करणार नाही. आपले परराष्ट्र सचिव चर्चेसाठी बांगलादेशात आहेत. आपण आवश्यकतेशिवाय अधिक बोलणे योग्य नाही. आपण निकालाची वाट बघायला हवी. आपण जबाबदार नागरिक आहोत. आपला देश एकसंध आहे."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBangladeshबांगलादेशHinduहिंदू