शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपच्या रणनीतीवर ओबीसी मुद्द्याचा प्रभाव, काँग्रेसच्या जनगणनेच्या घोषणेनंतर सतर्कता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 08:55 IST

बिहारनंतर मध्यप्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानमध्येही जातीनिहाय जनगणना करण्याच्या काँग्रेसच्या घोषणेनंतर भाजप सतर्क झाला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित केलेले नाही.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : जातनिहाय जनगणना व ओबीसी मुद्द्याचा प्रभाव भाजपच्या निवडणूक रणनीतीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही ओबीसींच्या मुद्द्यावर भाजपचा भर राहणार आहे. 

बिहारनंतर मध्यप्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानमध्येही जातीनिहाय जनगणना करण्याच्या काँग्रेसच्या घोषणेनंतर भाजप सतर्क झाला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे आल्याने स्थानिक नेतृत्वाविरोधातील नाराजी कमी होईल, असा होरा मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याच्या भाजपच्या रणनीतीमागे दिसतो. त्याचबरोबर तेथील नेतृत्वाची लढाई थांबेल व ओबीसी मुद्द्यावर विरोधकांकडून जे राजकारण केले जात आहे, त्याचाही प्रभाव कमी होईल, असे भाजप नेतृत्त्वाला वाटते. कारण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी आहेत.

मध्यप्रदेशात काय?- मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना बाजूला करण्यात आलेले नाही. कारण ते ओबीसी आहेत. - अन्य समुदायाच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास ओबीसी नाराज होण्याची शक्यता आहे. - छत्तीसगडमध्येही माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना उतरवणार आहे.

राजस्थानात काय?राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना पर्याय नाही. त्यासोबतच भाजप खा. दिया कुमारी यांना आणण्याची चर्चा आहे. दलित नेते अर्जुन मेघवाल, जाट समुदायाला आकर्षित करण्यासाठी कैलाश चौधरी व राजपूत नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनाही बळ दिले जाईल.

तेलंगणात काय?तेलंगणामध्ये केंद्रीय मंत्री किशन रेड्डी व ओबीसी नेते लक्ष्मण यांना महत्त्व देण्यात आले आहे. असे असले तरी या राज्यांमध्ये सरकार आल्यास कोणाकडे नेतृत्व देणार, याबाबत भाजपने आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाOBCअन्य मागासवर्गीय जातीElectionनिवडणूकPoliticsराजकारण