शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत कायदा करुन गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावं, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 12:39 IST

केंद्र सरकारने गायींना मौलिक अधिकार देण्यासंदर्भात विधेयक पारित करावं. संसदेत विधेयक पास करुन गायींना राष्ट्रीय पशू घोषित करावं, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ठळक मुद्देगाय ही भारतीय संस्कृतीचा महत्त्वाच भाग आहे. संसदेनं कायदा बनविल्यास सरकारने त्याची कडक अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने सूचवले आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद उच्च न्यायालयानेगायींबाबत महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे. गोरक्षाला (गायींची रक्षा) कुठल्याही धर्मासोबत जोडता कामा नये. गाईला आता राष्ट्रीय पशू घोषित करायला पाहिजे, केंद्र सरकारने यावर विचार करायला हवा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये, गायींना मौलिक अधिकार देण्याचंही त्यांनी सूचवलं आहे. 

केंद्र सरकारने गायींना मौलिक अधिकार देण्यासंदर्भात विधेयक पारित करावं. संसदेत विधेयक पास करुन गायींना राष्ट्रीय पशू घोषित करावं, असे न्यायालयाने म्हटले आहे. जेव्हा गायींचं कल्याण होईल, तेव्हाच देशाचं कल्याण होईल. गाय ही भारतीय संस्कृतीचा महत्त्वाच भाग आहे. संसदेनं कायदा बनविल्यास सरकारने त्याची कडक अंमलबजावणी करावी, असेही न्यायालयाने सूचवले आहे.

गोरक्षण ही केवळ एका धर्माची जबाबदारी नाही

जावेद नावाच्या व्यक्तीची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिपण्णी केली. जावेदवर गोहत्या बंदी कायद्यानुसार कलम 3,5, आणि 8 सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळत गाईंचे रक्षण केवळ एका धर्माची जबाबदारी नाही. गाय ही या देशाची संस्कृती असून गायींची सुरक्षा ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. मग, तुम्ही कुठल्याही धर्माचे व्यक्ती असाल, असे न्यायालयाने स्पष्टच सांगितलं. 

न्यायालयाची महत्वपूर्ण टिपण्णी

गोमांस खाणाऱ्यांनाच केवळ मौलिक अधिकार नाही. तर, गायींची पूजा करणाऱ्यांना आणि त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या निर्भर असलेल्यांनाही मौलिक अधिकार आहेत. 

जगण्याचा अधिकार हा मारण्याच्या अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे, गोमांस खाण्याच्या अधिकारास कधीही मौलिक अधिकार मानता येणार नाही. 

गाय म्हातारी आणि आजारी झाल्यानंतरही उपयोगी पशू आहे. गाईचे शेण, मुत्र हे शेती आणि औषधे बनविण्यासाठी उपयोगी पडते. 

केवळ हिंदूच गायींचे महत्त्व समजतात असे नाही. मुस्लीम नागरिकही गायींना भारतीय संस्कृतीचा महत्वपूर्ण हिस्सा मानतात. 

पाच मुस्लीम शासकांनी गायींची हत्या करण्यावर बंधनं आणली होती. बाबर, हुमायू आणि अकबर यांनीही आपल्या धार्मिक उत्सवात गायींचा बळी देण्याची प्रथा बंद केली होती. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcowगायParliamentसंसदIndiaभारतHinduहिंदूMuslimमुस्लीम