शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"२०२४ च्या निवडणुकीत भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार", नरेंद्र मोदींचा विश्वास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 18:28 IST

अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, उलट ही त्यांचीच फ्लोअर टेस्ट आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले . यावेळी नरेंद्र मोदींनीकाँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील जनतेने वारंवार व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल आज मी त्यांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याची सूचना केली, हा मी ईश्वराचाआशीर्वाद मानतो. २०१८ ला देखील ईश्वराचा आदेश होता. तेव्हाही अविश्वास प्रस्ताव आणला होता. यादरम्यान मी म्हणालो होतो की, अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, उलट ही त्यांचीच फ्लोअर टेस्ट आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

आम्ही जनतेसमोर गेलो. तेव्हा जनतेने त्यांच्यावर (विरोधक) अविश्वास जाहीर केला. निवडणुकीत भाजप आणि एनडीएला जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधकांचा अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ होता, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, २०२४ च्या निवडणुकीत एनडीए आणि भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार आहे, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच, संसदेत झालेल्या गदारोळाबद्दल नरेंद्र मोदी म्हणाले, डिजिटल डेटा संरक्षण विधेयक स्वतः तरुणांच्या भावनेशी जोडले गेले होते. अशा स्थितीत यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज होती, पण राजकारणाला आपले प्राधान्य होते, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

याचबरोबर, मागच्या काही दिवसात दोन्ही सभागृहात अनेक विधेयके मंजूर झाली. विधेयकावर चर्चा होणे अपेक्षित होत पण राजकारण तुमच्यासाठी महत्वाचे होते. त्यामुळे तुम्ही गोंधळात सर्व वेळ घातला. देशाच्या जनतेने ज्या कामासाठी यांना इथे पाठवल त्यांचाही विश्वासघात यांनी केला आहे. देशापेक्षा जास्त मोठा त्यांच्यासाठी पक्ष आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे.देशाच्या युवकांच्या भविष्याची तुम्हाला चिंता नाही, तर तुमच्या राजकीय कारकिर्दीची तुम्हाला चिंता आहे. तुमच्या एका एका शब्दाला देश एकत आहे. पण प्रत्येक वेळी देशाला तुम्ही निराशा सोडत आहात, अशी टीका सुद्धा नरेंद्र मोदी यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपाManipur Violenceमणिपूर हिंसाचार