शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Narendra Modi: मुंबई सारख्या शहरात प्रोजेक्ट तोवर वेगाने उतरवले जाऊ शकत नाहीत, जोवर...; पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 19:39 IST

मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही, पण...!

शहरांच्या विकासासाठी देशाकडे सामर्थ आणि राजकीय इछाशक्तीची कमी नाही. मात्र आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, मुंबई सारख्या शहरात, तोवर प्रोजेक्ट वेगाने उतरवले जाऊ शकत नाहीत, जोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राधान्य क्रमावर विकास नसेल. जेव्हा राज्यात विकासासाठी समर्पित सरकार असते आणि जेव्हा शहरांमध्ये  सुशासनासाठी समर्पित शासन असते, तेव्हाच ही कामे वेगाने जमिनीवर येऊ शकतात. यामुळेच मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिकाही मोठी आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही -मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही, केवळ मुंबईच्या हक्काच्या पैशांचा योग्य जागी विनियोग व्हायला हवा. जर तो भ्रष्टाचारात लागेल, बँकांच्या तिजोरीत पडून राहील, विकास कामे रोखण्याची प्रवृत्ती असेल, तर मुंबईचे भविष्य उज्वल कसे होईल, असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला. मुंबईतील लोकांना, येथील सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागावा, हे शहर विकासाठीशी तरसावे, अशी स्थिती २१ व्या शतकातील भारतासाठी अस्वीकार्य आहे आणि शिवजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर कधीच होऊ शकत नाही, असे म्हणत मोदींनी नाव न घेता महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर (उद्धव ठाकरे गट) हल्ला चढवला.

दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवे -भाजपचे सरकार असो अथवा एनडीएचे सरकार असो, राजकीय स्वार्थासाठी विकासाच्या कामांना ब्रेक लावत नाहीत. आधी मुंबईत असं होताना वारंवार पाहिले आहे.पीएम स्वनिधी योजनाही याचे उदाहरण आहे. असेही मोदी यावेळी म्हणाले. भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केले. तसेच, शिंदे-फडणवीसांची जोडी तुमचं स्वप्न पूर्ण करेल, असा विश्वासही महाराष्ट्रातील जनतेला दिला. दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवे आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

फेरीवाल्यांचा धंदा झाला नाही, उसने पैसे घेतलेले होते, ते व्याज देण्यातच जात होते. घरी मुले उपाशी असायची. आता तसे होणार नाही. मिळालेल्या स्वनिधीवर व्याज द्यावे लागणार नाही. तुम्ही एक पाऊल पुढे या मी 11 पावले येण्यास तयार आहे, असेही मोदी यावेळी म्हटले. मुंबईच्या या विकासकामांसाठी मी मुंबईचे, महाराष्ट्राचे आणि मुंबई ही देशाची राजधानी असल्याने देशातील जनतेचे अभिनंदन करतो, असेही मोदींनी यावेळी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका