शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

आशा अन् विश्वासाचं नवीन नाव 'भारत'; G20 मध्ये पंतप्रधान मोदींसमोर लावली नेमप्लेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 1:05 PM

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत आशा आणि विश्वासाचे नवीन नाव भारत असं लिहिलं आहे.

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या प्रगती मैदानावर भारत मंडपममध्ये जी-२० शिखर संमेलनाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासमोर भारत या नावाची नेमप्लेट लिहिली होती. सध्या देशात इंडिया-भारत नावावरून वाद उफाळून आला आहे. आगामी अधिवेशनात केंद्र सरकार इंडिया नावाऐवजी भारत या नावाचा वापर करण्याबाबत विधेयक आणू शकते असं बोलले जाते. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी पाठवलेल्या डिनर निमंत्रणावर प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख होता आणि जी-२० च्या पंतप्रधान मोदींसमोरील टेबलावर इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला आहे.

याबाबत भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत आशा आणि विश्वासाचे नवीन नाव भारत असं लिहिलं आहे. कुठल्याही जागतिक संघटनेच्या अधिकृत बैठकीत त्यांच्या  प्रतिनिधींसमोर देशाच्या नावाचा उल्लेख असतो. ज्यातून ती व्यक्ती कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करते हे दिसून येते. G20 शिखर संमेलनात पीएम मोदी यांच्या समोरील प्लेटवर इंडिया या इंग्रजी नावाऐवजी BHARAT असं लिहिले होते. अशावेळी पुन्हा एकदा देशात नाव बदलण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु अद्यात यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया केंद्र सरकारकडून आली नाही.

काय आहे वाद?

जी-२० शिखर परिषदेनिमित्त आयोजित स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर विद्यमान राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा संकेताबाहेरचा उल्लेख केल्याने देशाचे नाव इंडिया की भारत असा आणखी एक वाद सुरू झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसियान परिषदेतील उपस्थितीनिमित्तही इंडियाऐवजी भारत असा उल्लेख झाल्याने हा मामला आणखी गंभीर वळणावर पोहोचला. विरोधकांच्या आघाडीचे संक्षिप्त नाव इंडिया असल्याने त्या नावाला सत्ताधारी विरोध करीत असल्याचा आक्षेप घेतला गेला. थोडा गंभीर विचार केला तर राज्यघटनेच्या पहिल्या परिशिष्टातच ‘इंडिया दॅट इज भारत’ अशी सुरुवात असताना हा नवीन वाद उफाळून आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतG20 Summitजी-२० शिखर परिषद