शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

जम्मू-काश्मीरमध्ये परराज्यातील किती लोकांनी खरेदी केली जमीन? संसदेत मिळालं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 21:07 IST

केंद्र सरकारच्यावतीने राज्यसभा सभागृहात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलंय.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर देशभरातून या निर्णयाचं कौतुक झालं, काँग्रेससह काही पक्षांनी या निर्णयावर प्रश्नचिन्हही उपस्थितही केले. त्यावेळी, या निर्णयाचे काय-काय फायदे होतील, हे भाजप प्रवक्त्यांकडून व समर्थकांकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार, आता, जम्मू आणि काश्मीरमध्ये या राज्याबाहेरील लोकंही गुंतवणुकीसाठी, व्यावसायासाठी जागा खरेदी करू शकतात, असेही सांगण्यात आले. याबाबत, संसदेत विचारलेल्या प्रश्नातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या राज्यात परराज्यातील किती लोकांनी जागा खेरदी केलीय? हा प्रश्न संसेदत विचारण्यात आला होता. 

केंद्र सरकारच्यावतीने राज्यसभा सभागृहात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलंय. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी या प्रश्नावर लिखित उत्तर दिलं आहे. त्यानुसार, गेल्या तीन वर्षात जम्मू आणि कश्मीर मध्ये १८५ लोकांनी जमीन खरेदी केली आहे. जे यापूर्वी येथील केंद्र शासित प्रदेशचे रहिवाशी नव्हते. तर, केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये कुठल्याही बाहेरील व्यक्तीने जमीन खरेदी केली नाही, अशी माहितीही राय यांनी दिली. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह देशातील १५५९ कंपन्यांनी गुंतवणूक केल्याची माहितीही राय यांनी दिली.  

जम्मू आणि काश्मीर सरकारकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली असून ही माहिती २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षातील आहे. त्यामध्ये, २०२० मध्ये केवळ एका व्यक्तीने जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली होती. तर, २०२१ मध्ये ५७ लोकांनी, आणि २०२२ मध्ये सर्वाधिक १२७ जणांनी या केंद्र शासित प्रदेशात जमीन खरेदी केली आहे. दरम्यान, ५ ऑगस्ट २०१९ रोजी सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले होते. तसेच, जम्मू आणि काश्मीर व लडाख हे दोन राज्य निर्माण करत त्यांना केंद्र शासित प्रदेश घोषित करण्यात आले होते. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा