शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

संतापजनक! महाराष्ट्राच्या ST चालकाला कर्नाटकात काळं फासलं; "कन्नड येत नसेल तर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:17 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या उन्माद कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे सीमा भागातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यात चालकाला वाहनातून खाली ओढून कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड बोलायलाच हवं असं म्हणत कार्यकर्त्यांनी एसटी बसला आणि चालकाच्या तोंडाला काळे फासले. कर्नाटकातील चित्रदुर्गजवळ हा प्रकार घडला. या घटनेची माहिती चालकाने कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली. संबंधित प्रकारामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य परिवहन मंडळाची ही बस प्रवाशांना घेऊन मुंबईहून बंगळुरूला चालली होती. त्यावेळी चित्रदुर्गजवळ अचानक काही कन्नड कार्यकर्त्यांनी या बसला रोखले. कार्यकर्ते कन्नड भाषेत घोषणा देत होते. त्यानंतर चालकाला बसमधून खाली उतरवत त्याच्याशी हुज्जत घातली. तुम्हाला कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड यायलाच पाहिजे असा वाद कार्यकर्त्यांनी घातला. या वादात काही कार्यकर्त्यांनी एसटी बसला आणि चालकाला काळे फासले. त्यानंतर कार्यकर्ते तिथून पसार झाले.

दरम्यान, कित्येक दशकापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रलंबित आहे. या वादाचे अनेकदा पडसाद उमटले आहेत. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी पहिल्यांदाच समोर आली असं नाही. याआधीही या संघटनेने महाराष्ट्रातील वाहन चालकांवर हल्ले केलेत. २०२२ मध्ये बेळगावच्या हिरेबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात दगडफेक करून बसेस, ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. नंबर प्लेटचीही तोडफोड केली होती.  

हिंदी भाषिकांसाठी बंगळुरू बंद

अलीकडेच बंगळुरूत एक पोस्टर चांगलेच व्हायरल झाले होते. बंगळुरू उत्तर भारत आणि शेजारील राज्यांसाठी बंद आहे ज्यांना कन्नड शिकायचं नाही या पोस्टवरून नवा वाद निर्माण झाला होता. पोस्टमध्ये युजरने जे लोक स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करणार नसतील त्यांनी बंगळुरूत येऊ नये. बंगळुरू उत्तर भारत आणि इतर राज्यांसाठी बंद आहे ज्यांना कन्नड शिकण्याची गरज वाटत नाही. जे भाषा, संस्कृतीचा सन्मान करत नसतील त्यांची बंगळुरूला आवश्यकता नाही असं म्हटलं होते. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकborder disputeसीमा वाद