शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

मणिपूरमध्ये शांतता करार दुसऱ्याच दिवशी संपुष्टात; मैतेईबरोबर केलेला करार हमार जमातीच्या संघटनेकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 1:10 PM

...तसेच मैतेई जमातीबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याचे हमार जमातीच्या संघटनेने शनिवारी जाहीर केले.

इम्फाळ : मणिपूरमधील जिरिबाम जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मैतेई व हमार जमातींमध्ये करार होऊन २४ तास उलटायच्या आत त्या ठिकाणी हवेत गोळीबार करण्याच्या तसेच सध्या कोणीही राहत नसलेले घर जाळण्याच्या घटना शुक्रवारी रात्री घडल्या. तसेच मैतेई जमातीबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याचे हमार जमातीच्या संघटनेने शनिवारी जाहीर केले.

जिरिबाममध्ये हिंसाचार उफाळून आल्यानंतर तेथील काही गावांमध्ये मैतेई जमातीच्या लोकांनी आपली घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी पलायन केले होते. त्यापैकी एका गावातील घर जाळण्यात आले आहे. हे कृत्य करणाऱ्या सशस्त्र हल्लेखोरांनी हवेत गोळीबारही केला. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी त्या गावाकडे धाव घेतली. त्या हल्लेखोरांचा आता कसून शोध सुरू आहे. जिरिबाम येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी मैतेई व हमार या जमातींमध्ये आसाममधील कचर जिल्ह्यात सीआरपीएफ छावणीत गुरुवारी एक करार झाला होता. त्यासाठी जिल्हा प्रशासन, आसाम रायफल्स, सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

या करारप्रसंगी थाडौ, पायते आणि मिझो जमातीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या सर्वांची पुढील बैठक येत्या १५ ऑगस्टला आयोजिण्यात आली आहे. मैतेईबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याची घोषणा हमार इनपुई या संघटनेने केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. आमच्याशी संबंधित गटांनी प्रमुख नेत्यांना कल्पना न देता हा करार करण्यात आला होता असे या संघटनेने म्हटले आहे. करारात सहभागी झालेले लोक हे हमार जमातीचे प्रतिनिधी नाहीत असा दावाह करण्यात आला. शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात २००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता व हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. (वृत्तसंस्था

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे जवान तैनात ठेवामणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांमध्ये आसाम रायफल्सचेच जवान तैनात ठेवावेत. त्यांच्याऐवजी सीआरपीएफचे जवान या राज्यात तैनात करू नयेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी कुकी-झो जमातीच्या दहा आमदारांनी त्यांना पत्र पाठवून केली आहे. आसाम रायफल्समधील जवानांना मणिपूरची खडानखडा माहिती आहे. त्याऐवजी या परिसराची फारशी माहिती नसलेल्या दलाचे जवान तैनात केले तर मणिपूरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती कुकी-झो जमातीच्या आमदारांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार