शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

१७ लाखांची भरपाई मिळणार म्हणून पत्नी झाली 'विधवा', पतीकडून गुन्हा दाखल, महिला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 17:02 IST

Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

odisha train accident : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वेअपघातात आतापर्यंत २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अद्याप ८३ मृतदेहांची ओळख पटलेली नाही. दरम्यान, सरकारने आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला. भरपाई मिळवण्यासाठी एका महिलेने या रेल्वेअपघातात आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दाखवून तो आपला पती असल्याचे तिने सांगितले. मात्र, कागदपत्रांच्या तपासणीत महिलेचे खोटे पकडले गेले. हा प्रकार पतीला समजताच त्याने गुन्हा दाखल केला. तर अटकेच्या भीतीने महिला फरार आहे.

कटक जिल्ह्यातील महिलाओडिशातील कटक जिल्ह्यातील मणिबांदा येथील ही महिला असून गीतांजली दत्ता असे तिचे नाव आहे. तिने दावा केला होता की, २ जून रोजी तिचा पती विजय दत्ता याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मग तिने अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दाखवून तो आपला पती असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्याकडे कागदपत्रे मागितली असता तिचे खोटे पकडले गेले. खरं तर पोलिसांनी तिला इशारा देऊन सोडून दिले. पण ही बाब तिच्या पतीला कळताच त्याने मणिबंध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

१३ वर्षांपासून पतीपासून वेगळी राहते महिलाआरोपी महिलेचा पती विजयने सांगितले की, खोटी माहिती देऊन आणि त्याच्या मृत्यूचे खोटे सांगून नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गीतांजलीवर कठोर कारवाई करावी. लक्षणीय बाब म्हणजे हे जोडपे मागील १३ वर्षांपासून वेगळे राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. दुसरीकडे, रेल्वे मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. 

२८८ जण दगावले२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २८८ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.  

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातOdishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघातDeathमृत्यू