शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

गेल्या ५ वर्षांत भारताने पाहिले रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 8:30 AM

देशात होत असलेल्या परिवर्तनामध्ये खासदारांचाही मोठा वाटा आहे. गेल्या शतकांपासून लोकांना प्रतीक्षा होती ती कामेही पूर्ण झाली आहेत. 

नवी दिल्ली : १७व्या लोकसभेची पाच वर्षे हा रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मचा (सुधारणा, कामगिरी, परिवर्तन) काळ होता. आता देश वेगाने मोठ्या बदलांच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत ‘गेम चेंजर’ सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे २१व्या शतकातील समर्थ भारताचा भक्कम पाया निर्माण झाला. देशात होत असलेल्या परिवर्तनामध्ये खासदारांचाही मोठा वाटा आहे. गेल्या शतकांपासून लोकांना प्रतीक्षा होती ती कामेही पूर्ण झाली आहेत. 

१७व्या लोकसभेचे हे अंतिम अधिवेशन व तसेच शनिवारी शेवटची बैठक होती. त्याप्रसंगी मोदी म्हणाले की, देशात एकच संविधान असावे अशी जनतेची इच्छा होती. मात्र कलम ३७० रद्द करून ती इच्छा प्रत्यक्षात साकार केली. त्यामध्ये अनेक संकटे आली, पण त्यावर मात करून देशाने योग्य मार्गाने आपली वाटचाल सुरू ठेवली. 

‘कोरोनाच्या साथीचा समर्थपणे मुकाबला’मोदी यांनी सांगितले की, शतकातील सर्वात मोठ्या संकटाचा म्हणजे कोरोनाच्या साथीचा देशाने मुकाबला केला. या बिकट काळात संसदेच्या कामकाजावर विपरित परिणाम होणार नाही याची काळजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली होती. संसदेसाठी नवी इमारत हवी अशी चर्चा यापूर्वी अनेकदा केली जायची, पण लोकसभा अध्यक्षांनी यासंदर्भात ठाम निर्णय घेतला. संसदेची नवी इमारत साकारली. लोकसभेत सेंगोलची झालेली प्रस्थापना ही विशेष घटना आहे. 

ओम बिर्ला यांचा चेहरा नेहमी हसतमुख पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व खासदारांचे आभार मानले. मोदी म्हणाले की, लोकसभेत कोणतीही स्थिती उद्भवली तरी ओम बिर्ला यांचा चेहरा कायम हसरा असायचा. त्यांनी या सभागृहाचे कामकाज निष्पक्षपाती पद्धतीने चालविले. काही वेळा आरोप, प्रत्यारोप तसेच संताप, उद्वेगाचेही प्रसंग लोकसभेत घडले. पण ती परिस्थिती बिर्ला यांनी अतिशय कुशलतेने हाताळली. 

‘९७ टक्के कामकाज व्यवस्थित पार पडले’१७व्या लोकसभेत ९७ टक्के कामकाज व्यवस्थित पार पडले. १८व्या लोकसभेत १०० टक्के कामकाज नीट पार पडावे, त्यातून जनतेच्या हिताचे निर्णय व्हावेत याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. महिला आरक्षण विधेयक, त्रिवार तलाकवर घातलेली बंदी ही विधेयके संसदेत संमत झाली होती. त्याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. 

१७ व्या लोकसभेत  सर्वांत कमी बैठकालोकसभा व राज्यसभेचे कामकाज शनिवारी तहकूब करण्यात आले. संसदीय निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पार पडलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १७ व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन होते. गेल्या पाच वर्षांत सर्वांत कमी बैठका झाल्या असे पीआरएस या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. २०१९-२०२४ या कालावधीत लोकसभेच्या २७२ बैठका झाल्या. १४ व १५ व्या लोकसभेच्या अनुक्रमे ३३२, ३५६ बैठका झाल्या. 

१६ व्या लोकसभेच्या ३३१ बैठका झाल्या होत्या. १३ व्या लोकसभेच्या ३५६ बैठका झाल्या. १९५२ ते १९५७ या कालावधीत पहिल्या लोकसभेच्या ६७७ बैठका झाल्या. तो विक्रम आजही कायम आहे. सरकारने अनेक गोष्टीत सुधारणा केल्या, उत्तम कामगिरी बजावली, त्यामुळे देशात महत्त्वाचे बदल झाले, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी