शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

Karnataka Election: दोन पाटलांची दोस्ती, कधीच नाही कुस्ती; मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतील नेत्यांची चर्चा

By श्रीनिवास नागे | Published: May 05, 2023 7:01 PM

मुस्लिमबहुल मतदारसंघात कट्टर हिंदुत्ववादी आमदार

श्रीनिवास नागेविजयपूर : ‘ते’ दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत, दोघेही एका शहरातील, दोघांचे पक्ष वेगवेगळे, पण दोघांची दोस्ती; त्यामुळे त्यांच्यात कधीच निवडणुकीची कुस्ती झालेली नाही! ऐतिहासिक विजयपूर (विजापूर) जिल्ह्यात या दोघांचीच जोरदार चर्चा. काँग्रेसचे नेते एम. बी. पाटील आणि भाजपचे नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची ही कथा...कर्नाटकातील काँग्रेसमध्ये सध्या सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यासोबत बबलेश्वरचे आमदार एम. बी. पाटील यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणले गेले आहे. त्याचवेळी भाजपमधून विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आसुसलेले आहेत.विजयपूर जिल्ह्यात हे दोघे नेते बलवान समजले जातात. एम. बी. पाटील काँग्रेसमधील गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय आहेत. राजीव गांधी फाउंडेशनचे ते प्रमुख आहेत, तर बसनगौडा पाटील यांचा थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क असतो.बंगळुरू येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा सर्व खर्च एम. बी. पाटील यांनी उचलल्याचे बोलले जाते, तर यत्नाळ यांनी उत्तर कर्नाटकातील भाजपच्या उमेदवारांची जबाबदारी घेतली आहे. विरोधकच नव्हे तर पक्षातील नेत्यांवरही ते तोंडसुख घेतात. माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या विरोधात त्यांनीच आवाज उठविला होता.काँग्रेस सरकारमध्ये गृह, जलसंपदा अशी खाती सांभाळणारे एम. बी. पाटील महाराष्ट्राच्या सीमेवरील बबलेश्वर मतदार संघातील आमदार आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भागाला त्यांनीच तुबची-बबलेश्वर योजनेतून सायफन पद्धतीने पाणी देऊन कुरापत काढली होती.

मुस्लिमबहुल मतदारसंघात कट्टर हिंदुत्ववादी आमदारभाजपचे बसनगौडा पाटील हे कट्टर हिंदुत्ववादी नेते आहेत. विजयपूर शहरात मुस्लिम मतदारांची संख्या ३० टक्के असूनही ते निवडून येतात. यामागचे मुख्य कारण एम. बी. पाटील आणि त्यांची दोस्ती आहे, असे बोलले जाते.त्यांच्याविरोधात काँग्रेस नेहमीच कमजोर उमेदवार देते. बबलेश्वरमध्ये एम. बी. पाटील यांच्याविरोधात भाजपच्या विजूगौडा पाटील यांनी तीनवेळा पराभवाची नामुष्की स्वीकारली आहे. विशेष म्हणजे ते काँग्रेसचे माजी मंत्री तथा बसवनबागेवाडी येथील उमेदवार शिवानंद पाटील यांचे बंधू आहेत. बसनगौडा आणि एम. बी. पाटील या दोघांची दोस्ती पाहता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे या काँग्रेस-भाजपच्या नेत्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

दोस्तीसाठी सोयीचे मतदारसंघ

दोघे एकाच म्हणजे विजयपूर शहरात असूनही एकमेकांविरोधात कधीही उभे राहिलेले नाहीत. विजयपूर शहराची लोकसंख्या साडेचार ते पाच लाखांपर्यंत आहे. विधानसभेचा शहर मतदारसंघ वगळता शहरातील उर्वरित भाग बबलेश्वर मतदारसंघाला जोडलेला आहे.

दहा दिवसातून एकदा पाणी

आलमट्टी धरणाचे पाणी आल्यामुळे शहराशेजारी ऊसासोबत द्राक्ष आणि डाळींब बागा मोठ्या प्रमाणात आहेत. शहराला ४० किलोमीटरवरील कोलार येथून पाणी पुरविले जाते, पण नियोजनाअभावी दहा दिवसातून एकदा पाणी येते. विजयपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे, परंतु गेल्या आठ महिन्यांपासून महापौरपद रिक्त आहे. बसनगौडा पाटील यांनी विमानतळ मंजूर करून आणले आहे. बेदाण्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ त्यांच्या पुढाकाराने होत आहे. परंतु, जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आलेला नाही.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक