शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार

By admin | Published: June 17, 2017 11:14 PM

रेंद्र मोदी सरकारने येत्या पाच वर्षांत सात कलमी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास

वडोदरा : नरेंद्र मोदी सरकारने येत्या पाच वर्षांत सात कलमी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे दिली. देशाच्या वेगवेगळ््या राज्यांत शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या अस्वस्थेच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी मोदी यांनी या सात कलमी धोरणाला जाहीर केले होते. त्यात शेतकऱ्यांनापिकांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, उत्तम दर्जाची बियाणे आणि पीक काढल्यानंतर होणारे नुकसान टाळणे आदीचा समावेश होता. येथून ४० किलोमीटरवरील आणंद येथे शुक्रवारी जावडेकर यांच्या हस्ते मेकिंग आॅफ डेव्हलपड् इंडिया मेलाचे (मोदी फेस्ट) उद््घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. सात कलमांचा तपशील सांगताना जावडेकर म्हणाले की,‘‘पर ड्रॉप, मोअर क्रॉपद्वारे सिंचनावर मोठा भर असून त्यासाठी आर्थिक तरतूदही मोठी आहे. उत्तम दर्जाची बियाणे आणि प्रत्येक शेतजमिनीचा कस वाढवण्यासाठी पोषकघटक उपलब्ध करून देणे, गोदामांसाठी मोठी गुंतवणूक आणि कापणीनंतर पिकांची होणारी हानी टाळण्यासाठी शीतगृहांची साखळी निर्माण करणे तसेच अन्न प्रक्रियेद्वारे उत्पादनाची मूल्यवृद्धी करणे, राष्ट्रीय पातळीवर शेती बाजारपेठ तयार करणे, ५८५ स्टेशन्सवर ई प्लॅटफॉर्म तयार करणे, कुक्कुटपालन, मधमाशा पालन, मासेमारी आदी जोडव्यवसायाला प्रोत्साहन आणि परवडणाऱ्या किमतीत जोखीम कमी करणारी नवी विमा योजना सुरू करणे हे देखील या योजनेचे भाग आहेत.’’ निमकोटेड युरिया खताच्या छोट्या पिशव्या उपलब्ध झाल्यामुळे युरिया खताचा वापर कमी झाला असून त्यावरील वार्षिक अनुदानापोटीचे सात हजार कोटी वाचले आहेत, असेही जावडेकर म्हणाले.पूर्वी शेतीतील उत्पादन वाढवण्याची पद्धत टाळून त्याऐवजी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर आहे, असे जावडेकर म्हणाले. 2022 पर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे ठरवले आहे.