शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

लागवड वाढत असल्याने दरांवर दबाव शक्य

By admin | Published: April 18, 2016 12:47 AM

जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच्या दरांवर दबाव निर्माण होईल, असे मत पुणे येथील कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.विनय सुपे यांनी शनिवारी व्यक्त केले.

जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच्या दरांवर दबाव निर्माण होईल, असे मत पुणे येथील कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.विनय सुपे यांनी शनिवारी व्यक्त केले.
जैन हिल्सवर आयोजित डाळिंब परिषदेत सुपे यांनी तांत्रिक सत्रात डाळिंबाचे खत व्यवस्थापन व गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले.

दिवसाआड फवारणीची गरज नाही...
डाळिंब पिकावरील खर्च कमी व्हायला हवा. उत्पादक दिवसाआड फवारणी करतात. अनावश्यकपणे खते देतात. आपली जमीन कशी आहे याचा विचार करायला हवा. या अनावश्यक प्रकारामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, असेही सुपे म्हणाले.
डाळिंब मूळचे इराणचे फळ
डाळिंब इराणचे फळ आहे. चीन, रशिया, मध्य आशिया असा प्रवास करीत हे फळ भारतात हिमाचल प्रदेशात आले. तेथून हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागात ते आले, अशी माहिती सुपे यांनी दिली.

तीन ते आठ टक्के चुनखडी नसली तरी चालेल...
डाळिंबाचे पीक ज्या जमिनीचा सामू ६.०, क्षारता ०.१० ते ०.५० डेसीसायमन मीटर आणि चुनखडी तीन ते आठ टक्के आहे, अशा जमिनीत चांगले येते, असा निष्कर्ष आहे. परंतु २० ते २२ टक्के चुनखडी असलेल्या जमिनीतही योग्य पाणी व खत व्यवस्थापनाने डाळिंब घेता येईल, असा दावा सुपे यांनी केला.

सात बाय सात फूटांवरील लागवडीचा धोका
डाळिंबाची लागवड सात बाय सात फूटांवर केली तर धोके वाढतात. १० बाय १५ फूट या अंतरात त्याची लागवड करणे योग्य आहे. यापेक्षा कमी अंतरात लागवड केली तर आर्द्रता वाढणे, हवा खेळती न राहणे, अशा समस्या निर्माण होतात आणि रोगराई वाढते. तेल्या रोग, अशा बागांमध्ये फोफावू शकतो, असे मतही सुपे यांनी व्यक्त केले.

सेंद्रीय मल्चींगमध्ये गव्हाचे कूट नको
बागेत सेंद्रीय मल्चींग (आच्छादन) करणे योग्य असते. पण गव्हाचे कूट टाकणे योग्य नाही. काड्या, पाला, पाचोळा, सोयाबीनच्या काढणीनंतर येणारा भुसा, गवत आदींचा वापर करता येईल. सेंद्रीय मल्चींग अतिशय लाभदायी असते, असेही सुपे यांनी सांगितले.
छाटणीची गरज नाही
पूर्वीच्या काळात डाळिंबाच्या बागांमध्ये छाटणीची गरज नसायची, पण अलीकडे छाटणीशिवाय बागच घेतली जात नाही. २५ रुपये प्रतिझाड, अशी मजुरी त्यासाठी वाया घालविली जाते. अशास्त्रीय पद्धतीने छाटणी केली जाते. शिवाय छाटणीनंतर लागलीच पाणी दिले जाते. पण त्यानंतर बागेला १० दिवस पाणी द्यायला नको. हलकी छाटणी करायला हवी, असेही सुपे म्हणाले.
फड पद्धतीने पाणी देऊ नये
डाळिंब बागेला फड पद्धतीने पाणी देऊ नये. ड्रीप वापरावे. तसेच खते व पाणी देण्यापूर्वी माती व पाणी परीक्षण करून घ्यावे, असे सुपे यांनी सांगितले.