शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान मुख्यमंत्री पुन्हा पराभूत; उत्तराखंडमध्ये काँग्रेसची कामगिरी किंचित सुधारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 12:01 IST

राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा खटिमा मतदारसंघात काँग्रेसचे भुवन चंद्र कापरी यांनी ६ हजार ५७९ मतांनी पराभव केला.

लोकमत न्यूज नेटवर्कडेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत दोन तृतीयांश जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा मानही पटकावला. ७० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसची कामगिरी किंचित सुधारली. 

राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा खटिमा मतदारसंघात काँग्रेसचे भुवन चंद्र कापरी यांनी ६ हजार ५७९ मतांनी पराभव केला. वार्ताहरांशी बोलताना धामी म्हणाले, ‘व्हीजन डाॅक्युमेंटमध्ये आम्ही जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली. अतिशय मोठे यश दिल्याबद्दल मतदारांचे आभार.’ समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या स्वत:च दिलेल्या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

भाजपने ७० सदस्यांच्या विधानसभेत ३१ जागा जिंकून १६ मतदारसंघांत आघाडी मिळवली आहे तर काँग्रेसने १३ जागा जिंकून ६ जागांवर आघाडी घेतली आहे. २०१७ मधील निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकल्या होत्या. सर्व ७० जागा लढवलेल्या आम आदमी पक्षाला राज्यात एकही यश मिळालेले नाही. २०१७ च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला एकही जागा नव्हती. यावेळी त्याने एक जागा जिंकली असून, दुसरा उमेदवार पुढे आहे.धामी पराभूत झाल्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण असेल, हा सध्या प्रश्न आहे. पुष्कर धामी यांना पुन्हा संधी दिली जाण्यावर कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, ‘या प्रश्नाचे उत्तर आता कोणी देऊ शकत नाही. हा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळ घेईल.’ भाजपचे चंपावत मतदारसंघातील विजयी उमेदवार कैलाश गाहातोडी यांनी धामी यांच्यासाठी आमदारकी सोडण्याची तयारी दाखवली आहे.

यशाचे श्रेय मोदींनाउत्तराखंडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधातील जनमतामुळे वर्ष २००० पासूनएकाच पक्षाला सलग दुसऱ्यांदासंधी मिळाली नव्हती. भाजपने मतदारांवर राष्ट्रहित, राष्ट्राची सुरक्षा, लष्करी कल्याण आणि धार्मिक पर्यटन आदी मुद्द्यांवरून प्रभाव पाडला, हे मतदानातून दिसले. भाजपच्या या यशाचे श्रेय राजकीय निरीक्षक नरेंद्र मोदी या घटकाला सगळ्यात आधी देतात. 

टॅग्स :Uttarakhand Assembly Election Results 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक निकाल २०२२