शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

Independence Day 2021: जाणून घ्या, १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिनाच्या ६० दिवस आधी देशात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 2:47 PM

Celebration 15th Auguest 2021: ब्रिटीश सरकारने ब्रिटीश भारताला दोन राज्यात विभाजन करण्याचा विचार ३ जून १९४७ मध्ये स्वीकारला.

ठळक मुद्दे१९४६ मध्ये ब्रिटनच्या लेबर पार्टी सरकारचा आर्थिक खजिना दुसऱ्या महायुद्धानंतर रिकामा झाला होताब्रिटीश सरकार जून १९४८ पासून भारताला पूर्णपणे स्व-अधिकार देईलतत्कालीन पंतप्रधान क्लीमेंट एटली यांनी फेब्रुवारी १९४७ मध्ये घोषणा केली होती.

नवी दिल्ली – १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. यंदा भारत ७५ व्या स्वातंत्र्यदिनी अमृत दिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहित्येत १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिनाच्या ६० दिवस आधी भारतात काय काय झालं? यातील अनेक असे किस्से आहेत जे अनेकांना माहिती नसतील. यात भारत-पाकिस्तान फाळणी, सीमा मोजणी, दंगल आणि माउंटबेटन योजना आणि राजघराणे भारतात विलीन करण्याचा मुख्य समावेश होता.

१९४६ मध्ये ब्रिटनच्या लेबर पार्टी सरकारचा आर्थिक खजिना दुसऱ्या महायुद्धानंतर रिकामा झाला होता. तेव्हा ना घरात लोकांचे समर्थन होतं ना आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन याची जाणीव ब्रिटनला झाली. त्यामुळे ब्रिटन अस्वस्थ झाला होता. त्यामुळे भारतावर नियंत्रण करण्यासाठी असणाऱ्या देशी दलांचा विश्वास उडत चालला होता. फेब्रुवारी १९४७ पंतप्रधान क्लीमेंट एटली यांनी घोषणा केली की, ब्रिटीश सरकार जून १९४८ पासून भारताला पूर्णपणे स्व-अधिकार देईल. त्यानंतर वायसराय लॉर्ड माउंटबेटनने सत्ता हस्तांतरण करण्याची तारीख पुढे ढकलली.

माउंटबेटनला वाटत होतं की, काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे सरकार कोसळू शकतं. सत्ता हस्तातरणाची तारीख दुसऱ्या विश्वयुद्धात जपानने आत्मसमर्पण केल्याला दोन वर्ष झाल्यानं १५ ऑगस्ट निवडली होती. ब्रिटीश सरकारने ब्रिटीश भारताला दोन राज्यात विभाजन करण्याचा विचार ३ जून १९४७ मध्ये स्वीकारला. तसेच दोन्ही सरकारला स्वतंत्र्य अधिकार दिले जातील. त्यांना ब्रिटीश कॉमनवेल्थपासून वेगळे होण्याचा अधिकार येतील अशी घोषणा केली.

स्वातंत्र्यापूर्वीचे ६० दिवस

ब्रिटीश सरकारने ३ जून १९४७ ला भारताच्या विभाजाचा निर्णय घेतला. भारताच्या विभाजनाची योजना माउंटबेटन योजना म्हणून ओळखली जाते. भारत-पाकिस्तानची सीमा रेषा ठरली. १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटीश संसदेत भारताला स्वतंत्रता देणारा कायदा पारित झाला. त्यानंतर ५६५ मधील ५५२ राजघराणी स्वच्छेने भारतात समाविष्ट झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी १४ ऑगस्टला वेगळं पाकिस्तान बनवलं.

विभाजनावेळी बंगाल, बिहार आणि पंजाबमध्ये दंगल झाली. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यता दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. दंगली रोखण्यासाठी महात्मा गांधी १५ ऑगस्टला बंगालच्या नोआखलीमध्ये उपोषण करत होते. (Happy independence day 2021) लाखो मुस्लीम, सिख आणि हिंदू शरणार्थी स्वातंत्र्यानंतर नवीन सीमेतून पायी प्रवास करत होते. पंजाब ज्याठिकाणी सीमेमुळे दोन प्रांत वेगळे झाले. तिथे मोठा हिंसाचार घडला. रक्तपात झाला. बंगाल, बिहार येथे हिंसक आंदोलनं झाली. नवीन सीमेमुळे दोन्ही देशांचे २ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

१४ ऑगस्टला संविधान सभेची बैठक होती. या बैठकीच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभेच्या बैठकीनंतर भारत स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केली. या बैठकीत जवाहर लाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करत ट्रिस्ट विद डेस्टिनी नावाचं भाषण केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचं कोणतंही राष्ट्रगीत नव्हतं. रवींद्रनाथ टागोरांनी जन गण मन १९५० मध्ये लिहिलं होतं.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनMahatma Gandhiमहात्मा गांधीPakistanपाकिस्तानIndiaभारत