शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

भारीच! हर घर तिरंगा अभियानामुळे झाला तब्बल 500 कोटींचा व्यापार: 10 लाख लोकांना रोजगार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 2:59 PM

Independence Day 2022 : हर घर तिरंगा अभियानाने भारतीय उद्योजकांची क्षमताही दाखवून दिली आहे. ज्यांनी देशातील जनतेची तिरंग्याची अभूतपूर्व मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे 20 दिवसांच्या विक्रमी वेळेत 30 कोटींहून अधिक तिरंग्यांची निर्मिती केली.

नवी दिल्ली-  स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या हर घर तिरंगा अभियानामुळे आत्मनिर्भर भारत उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. यावेळी हर घर तिरंगा अभियानामुळे देशभरात 30 कोटींहून अधिक राष्ट्रध्वजांची विक्री झाली असून, तिरंग्याबाबत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जवळपास 500 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे म्हणणे आहे की देशभक्ती आणि स्वयंरोजगाराच्या या अभियानामुळे देशभरातील लोकांमध्ये देशभक्तीची एक अद्भुत भावना आणि को-ऑपरेटिव्ह व्यवसायाची शक्यता निर्माण झाली आहे. 

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांत मोठ्या संख्येने व्यापारी संघटनांनी CAT च्या झेंड्याखाली देशभरात 3000 हून अधिक तिरंगा कार्यक्रम आयोजित केले ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी स्वइच्छेने भाग घेतला. व्यापाऱ्यांसह विविध क्षेत्रातील लोकांनी पुढे जाऊन तिरंग्याची शान कायम ठेवली. हर घर तिरंगा अभियानाने भारतीय उद्योजकांची क्षमताही दाखवून दिली आहे. ज्यांनी देशातील जनतेची तिरंग्याची अभूतपूर्व मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे 20 दिवसांच्या विक्रमी वेळेत 30 कोटींहून अधिक तिरंग्यांची निर्मिती केली.

CAT च्या आवाहनावर, देशभरातील व्यापारी संघटनांनी सर्व राज्यांमध्ये रॅली, मिरवणुका, तिरंगा गौरव यात्रा, सार्वजनिक सभा आणि परिषदांसह तिरंगा कार्यक्रम आयोजित करून देशभक्तीची भावना जागृत केली. भरतिया आणि खंडेलवाल म्हणाले की, केंद्र सरकारने पॉलिस्टर आणि मशीनद्वारे बनवलेल्या ध्वजांना परवानगी देणार्‍या ध्वज संहितेत केलेल्या बदलांमुळेही देशभरात ध्वज सहज उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागला आहे. पूर्वी भारतीय तिरंगा फक्त खादी किंवा कापडात बनवण्याची परवानगी होती. ध्वज संहितेतील या दुरुस्तीमुळे देशातील 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला, ज्यांनी स्थानिक शिंपींच्या मदतीने त्यांच्या घरी किंवा छोट्या ठिकाणी तिरंगा ध्वज मोठ्या प्रमाणावर बनवला.

एसएमई उत्पादन आणि व्यापार क्षेत्राने अत्यंत संघटित पद्धतीने मोठ्या संख्येने भारतीय ध्वज तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम केले. सामान्यतः बनवलेल्या ध्वजाच्या विविध आकारांमध्ये 6800×4200 mm, 3600×2400 mm, 1800×1200 mm, 1350×900 mm, 900×600 mm, 450×300 mm, 225×150 mm आणि 05h mm चा समावेश आहे. याआधी स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय तिरंग्याची वार्षिक विक्री सुमारे 150-200 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होती. तर हर घर तिरंगा अभियानामुळे विक्री अनेक पटींनी वाढून 500 कोटी रुपये झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत