शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

"आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, तालिबानचं भारताला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:13 IST

India Afghanistan Relations: मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडून भारत सरकारला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडूनभारत सरकारला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे. ‘’आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, असं आश्वासन तालिबाननं भारताला दिलं आले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी यांच्यामध्ये दुबईत झालेल्या भेटीवेळी तालिबानकडून हे आश्वासन देण्यात आले.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे सध्या दुबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी यांची भेट घेऊन चर्चा केली. २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार स्थापन झाल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान सरकारमधील ही पहिलीच उच्चस्तरीय द्विपक्षीय भेट ठरली आहे. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांसह क्षेत्रिय विकास आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये इराणमधील चाबहार बंदराचा वापक आणि क्रिकेट या मुद्द्यांचाही समावेश होता. तसेच पाकिस्तानमधील अफगाण निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी मदत करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

भारताच्या परराष्ट् मंत्रालयाने सांगितले की, अफगाण सरकारने भारताच्या सुरक्षेबाबतच्या चिंता विचारात घेतल्या. अफगाणिस्तानच्या भूमीवरून भारतविरोधी दहशतवादी कारवायांना खतपाणी मिळू नये, अशी भारताची इच्छा आहे. त्याबाबत महत्त्वाचं आश्वासन देताना तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरोधातील कारवायांसाठी होऊ दिला जाणार नाही, असे सांगितले.

या भेटीदरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी भारत आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये असलेल्या ऐतिहासिक मैत्रीवर भर दिला. दोन्ही पक्षांनी भारत सरकारकडून सुरू असलेल्या मानवतावादी मदत कार्यक्रमाचं मूल्यांकन केलं. तसेच अफगाणिस्तानच्या मंत्र्यांनी त्यासाठी भारताचं कौतुकही केलं.  

टॅग्स :IndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTerrorismदहशतवादInternationalआंतरराष्ट्रीय