शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

24 तास मोफत वीज, प्रत्येक गावात शाळा-क्लिनिक.., पत्नीने वाचले अरविंद केजरीवालांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 14:30 IST

ईडीच्या तुरुंगात कैद असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी देशातील जनतेच्या नावे एक पत्र लिहिले.

I.N.D.I.A Rally In Delhi Ramlila Maidan: दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लाँड्रिंकप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED ने अटक केली आहे. दरम्यान, आज दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या मेगा रॅलीमध्ये केजरीवालांच्या अटकेवरुन विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, यावेली अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी मंचावरुन अरविंद केजरीवाल यांचे पत्र वाचून दाखवले.

दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या सभेतून सुनीता केजरीवाल यांनीही भाषण केले. यावेळी त्यांनी ED च्या ताब्यात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पत्र वाचून दाखवले. सुनीता केजरीवाल म्हणाल्या, अरविंद केजरीवाल 'शेर' आहेत. त्यांनी तुरुंगातून जनतेसाठी खास पत्र पाठवले. या पत्रात अरविंदजी यांनी देशातील जनतेला 6 हमी दिल्या आहेत. भारतात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर पुढील 5 वर्षांत या 6 हमींची पूर्तता केली जाईल. 

काय आहेत अरविंद केजरीवाल यांच्या 6 हमी?1. संपूर्ण देशात 24 तास वीज दिली जाईल.2. देशभरातील गरिबांना मोफत वीज मिळेल.3. सर्व गावात अतिशय चांगल्या शाळा सुरू होतील आणि त्यात सर्वांना समान शिक्षण मिळेल.4. आम्ही प्रत्येक गावात आणि परिसरात मोहल्ला क्लिनिक स्थापन करू आणि प्रत्येक व्यक्तीसाठी मोफत उपचाराची व्यवस्था करू.5. स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी भाव दिला जाईल.6. दिल्लीच्या लोकांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल.

संबधित बातमी- 'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात

केजरीवालांनी पत्रात आणखी काय म्हटले?सुनीता केजरीवाल म्हणाल्या, भाजपचे लोक म्हणतात की केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा. पण, तुमचे केजरीवाल 'शेर' आहेत. केजरीवाल करोडो लोकांच्या हृदयात राहतात. अरविंद केजरीवाल यांच्या पत्रात लिहिले की, माझ्या प्रिय भारतीयांनो, तुरुंगातून तुमच्या या भावाच्या शुभेच्छा स्वीकारा. मी तुमची मते मागत नाहीये. मी 140 कोटी भारतीयांना नवीन भारत घडवण्यासाठी आमंत्रित करतो. भारत हा एक महान देश आहे, एक महान संस्कृती. देशाची लूट करणाऱ्या लोकांचा भारत माता तीव्र तिरस्कार करते. आज देशातील प्रत्येक हाताला काम मिळाले पाहिजे, प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. पत्राच्या शेवटी अरविंद केजरीवाल म्हणतात की, मी तुरुंगात असूनही निरोगी आणि उर्जेने भरलेलो आहे. मी लवकरच बाहेर येऊन तुम्हाला भेटेन.

रॅलीत हे नेते सहभागी झाले...लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A. आघाडीतील 27 पक्षांनी रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर लोकशाही वाचवा रॅली काढली. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि समाजवादी प्रमुख अखिलेश यादवही आले. त्यांच्यासोबत शिवसेना (यूबीटी) संजय राऊत, सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, आदित्य ठाकरे, एनसीपी प्रमुख शरद पवार, आप नेते आतिशी, गोपाल राय, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्लाही उपस्थित आहेत. याशिवाय, जमीन विक्री भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४