शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

बंगालमध्ये I.N.D.I.A.वरील 'ममता' आटली; आता UP, बिहार, पंजाबमध्ये काय होणार? समजून घ्या राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 2:17 PM

आता उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये काय होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर लोकसभा निवडणुकीला एकट्याने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता टीएमसी स्वबळावर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्याकडून काँग्रेसला केवळ 2 जागांचीच ऑफर देण्यात आली होती. यामुळे काँग्रेस नाराज होती. अखेर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर राग व्यक्त करत विरोधकांच्या INDIA मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे बंगालमध्ये INDIA मध्ये पहिली फूट पडली आहे. तेथे विरोधकांची आघाडी ढेपाळली आहे. आता उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये काय होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कारण येथील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. येथे जागावाटपासंदर्भात एक मेकांना प्रस्ताव दिले गेले आहेत. मात्र अद्याप एकमत झालेले नाही.

बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी यांच्यातच अद्याप लोकसभा जागावाटपासंदर्भात सहमती झालेली नाही. याशिवाय काँग्रेस आणि सीपीआय यांच्यातही पेच आहे. काँग्रेसकडून साधारणपणे अर्धा डझन जागा बिहारमध्ये मागत आहे. मात्र नितीश कुमार आणि लालू यादव काँग्रेसला एवढ्या जागा देण्यास अनुकूल नाहीत. 

अशीच स्थिती उत्तर प्रदेशातही आहे. नुकतीच अखिलेश यादव यांच्यासोबत काँग्रेसच्या आघाडी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत काँग्रेसने तब्बल 20 जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जाते. त्यांनी 2009 चा फॉर्म्युला समोर ठेवत मध्य यूपीतील अधिकांश जागांवर दावा केला असून अखिलेश यादव यांच्याकडे 20 जागा मागितल्या आहेत.

अखिलेशही घेऊ शकतात ममतांसारखी भूमिका - काँग्रेसच्या 20 जागांच्या प्रस्तावानंतर सपा देखील नाखूश आहे.  भाजपासोबत थेट टक्कर घेतल्यास काँग्रेस कमकुवत होईल आणि त्यांच्यासाठी जागा काढणे अवघड होईल, असे सपाचे मत आहे. महत्वाचे म्हणजे, खुद्द राहुल गांधी यांनाही अमेठीमद्ये आपली जागा राखता आलेली नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेस सुल्तानपूर, अमेठी, रायबरेली, शाहजहांपूर, धौरहरा, गाजियाबादसह जवळपास 20 जागांवर दावा करत आहे. या जागा आम्हाला देण्यात याव्यात कारण 2004 अथवा 2009 मध्ये आपण या जागांवर विजय मिळवला होता असा त्यांचा युक्तीवाद आहे. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता काँग्रेसला जागा देणे, म्हणजे, विजयाची शक्यता कमी करण्यासारखे होईल, असे अखिलेश यादव यांना वाटते आहे. तेव्हा सपाने काँग्रेसला 100 जागा दिल्या होत्या. मात्र त्यांना केवळ 7 जागा मिळाल्या होत्या.

पंजाबमध्ये काय होणार...?काहीशी अशीच परिस्थिती पंजाबातही आहे. येथे आम आदमी पार्टी सत्तेवर आहे. लोकसभेतही आपल्याला मोठे यश मिळेल अशी त्यांची धारणा आहे. तर दुसरीकडे आपले 8 खासदार आहेत त्या पेक्षा कमी जागांवर आपण लढणार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे येथेही काय होते हे बघण्यासारखे असणार आहे.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMamata Banerjeeममता बॅनर्जीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारPunjabपंजाबAAPआपNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवcongressकाँग्रेस