शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

"INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती..."; आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:41 IST

इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती होती. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वाद होणे हे अस्वाभाविक नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.

पटना - इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी होती असं विधान आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाच्या वादात तेजस्वी यादव यांनी हे विधान केले. बिहार विधानसभा निवडणूक आणि दिल्ली निवडणुकीवर तेजस्वी यादव यांनी आरजेडीची भूमिका स्पष्ट केली. 

तेजस्वी यादव यांच्या विधानामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच तेजस्वी यादव यांनी केलेले विधान काँग्रेससाठी चिंताजनक आहे. इंडिया आघाडी आता भूतकाळ झाली. ही आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बनवण्यात आली होती. आता पुढच्या निवडणुकीत त्याचा फार अर्थ नाही असं त्यांनी सांगितले. पत्रकारांनी तेजस्वी यादव यांना दिल्लीत आप आणि काँग्रेसमधील वादावर प्रश्न विचारला होता त्यावरून तेजस्वी यादव यांनी हे उत्तर दिले.

इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती होती. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वाद होणे हे अस्वाभाविक नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटल्याने राष्ट्रीय जनता दलही काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारे आघाडी करण्यास उत्सुक नसल्याचं दिसून येते. बिहार विधानसभा निवडणुकीबाबत अद्याप पक्षाने निर्णय घेतला नाही. दिल्लीत निवडणूक लढवायची की नाही हे ठरले नाही असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपने भाजपाविरोधात एकत्रित निवडणूक लढवली होती परंतु विधानसभेला हे दोन्ही पक्ष वेगळे निवडणुकीत उतरले आहेत. समाजवादी पक्षानेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

दरम्यान, बिहारमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून त्यात राजद आणि काँग्रेस एकत्रित लढतील असं बोलले जाते परंतु जागावाटपावरून दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे. काँग्रेसने कमीत कमी ७० जागा लढाव्यात असं स्थानिक नेते सांगतात त्याशिवाय जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली आहे. त्याचवेळी तेजस्वी यादव यांनी केलेले विधान काँग्रेसला संकेत दिल्याचीही चर्चा आहे.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप