शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
3
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
4
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
5
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
6
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
7
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
8
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
9
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
10
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
11
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
12
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
13
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
14
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
15
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
16
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
17
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
18
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
19
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
20
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...

‘इंडिया’ आघाडी भाजपला धूळ चारेल; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 6:27 AM

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे.

कोहिमा : अयोध्येतील २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. हा निवडणूक कार्यक्रम झाला आहे. त्यामुळेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले. 

भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.  इंडियाची स्थिती भक्कम आहे. जागावाटपाचा मुद्दाही लवकर सोडवला जाईल. इंडिया आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारेल, असा दावा त्यांनी केला.  

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने २२ जानेवारीच्या सोहळ्याला पूर्णपणे राजकीय रंग दिला आहे. हा संघ आणि भाजपचा कार्यक्रम बनला आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले, असे ते म्हणाले. 

‘छोट्या राज्याचे’ असला तरीही तुम्ही बरोबरीचेनागालँडचे लोक ‘छोट्या राज्याचे’ असले तरी त्यांनी स्वत:ला देशातील इतर लोकांच्या बरोबरीचे समजले पाहिजे, असे राहुल म्हणाले.लोकांना न्याय देणे तसेच राजकारण, अर्थव्यवस्थेला सर्वांसाठी समान व सुलभ बनविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. तुमचे राज्य लहान असले तरी काही फरक पडत नाही, तुम्ही स्वतःला देशातील इतर लोकांच्या बरोबरीचे समजले पाहिजे, असे ते म्हणाले.

राहुल गांधी एका वेगळ्याच जगात राहतात : भाजपअयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात केलेल्या टिपण्णीवरून भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ते वेगळ्याच जगात राहतात आणि खोटे बोललो तरी सुटून जाऊ, असे त्यांना वाटते, असा घणाघात केंद्रातील या सत्ताधारी पक्षाने केला. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजीव चंद्रशेखर म्हणाले की, हिंदूंच्या श्रद्धेवर प्रभाव पाडला जाऊ शकतो, यावर लोकांनी विश्वास ठेवावा, असे राहुल यांना वाटते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा