शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

संविधानाचं कलम १ काय आहे? ज्याचा हवाला देत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 3:36 PM

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर आक्षेप घेतला तर पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी इंडिया आणि भारत यावर संविधानाचा दाखला दिला

नवी दिल्ली – भारत जगातील जी-२० विकसित आणि विकसनशील देशांच्या संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. राजधानी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी-२० चं शिखर संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात भाग घेण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विविध राजकीय पक्ष आणि प्रमुख नेत्यांना भोजन आयोजित केले आहे. त्यासाठी पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. परंतु त्यावर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असं छापण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर आक्षेप घेतला तर पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी इंडिया आणि भारत यावर संविधानाचा दाखला दिला. दोन्ही नेत्यांनी संविधानातील कलम १ मधील भारत संघराज्य घटक असल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर सोशल मीडियावर आर्टिकल १ ट्रेंड होऊ लागले. अखेर संविधानातील कलम १ मध्ये इंडिया आणि भारत याबाबत काय सांगितले गेले आहे अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

राहुल गांधींनी आर्टिकल १ बाबत एका वाक्यात ट्विट केले आहे. त्यात लिहिलंय की, इंडिया म्हणजे भारत हा राज्यांचा एक संघ आहे. याचआधारे देशात एक देश, एक निवडणूक चर्चेचेही खंडन केले. भारतात एक देश, एक निवडणूक हा विचार भारतीय राज्यसंघाच्या अधिकारांवर गदा आहे. तर दुसरीकडे जयराम रमेश यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी इतिहासाची तोडमोड करून देशाचे विभाजन करत आहेत. मोदी इतिहासात फेरफार करून इंडिया म्हणजे भारत संघराज्य विभाजित करू शकतात. परंतु आम्ही डगमगणार नाही असं जयराम रमेश यांनी सांगितले.

कलम १ काय म्हणते, जाणून घ्या

चला तर मग जाणून घेऊया संविधानाच्या कलम १ मध्ये भारत आणि इंडियाबद्दल काय सांगितले आहे. कलम १ चे शीर्षक 'संघ आणि त्याचे प्रदेश' आहे. यामध्ये म्हटले आहे..

१. संघाचे नाव आणि प्रदेश - (१) भारत, म्हणजेच इंडिया, राज्यांचा संघ असेल.

(२) राज्ये आणि त्यांचे प्रदेश पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असतील.

(३) भारताच्या हद्दीत,—

(क) राज्यांची हद्द,

(ख) पहिल्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केंद्रशासित प्रदेश, आणि

(ग) अधिग्रहित केले जातील असे इतर प्रदेश समाविष्ट असतील.

राज्यांचा संघ म्हणजे काय?

यूरोपियन यूनियमध्ये सहभागी सर्व देशांचा संघ आहे. त्यांची सरकारे आहेत, सीमा आहेत. परंतु व्यापार, राजकीय-आर्थिक धोरणांसाठी सर्वांनी मिळून एक संघ बनवला आहे. भारतातही राज्ये आहेत. प्रत्येकाची आपापली सरकारे आहेत. प्रत्येकाचे सीमा क्षेत्र आहे. परंतु भारत सरकार या सीमा क्षेत्रात बदलही करू शकते. संविधानातील कलम २ मध्ये संसदेत कायद्याद्वारे नियम आणि अटींवर जे योग्य वाटेल अशा नवीन राज्यांचा प्रवेश अथवा स्थापना करू शकेल. त्यानंतर कलम ३ मध्ये भारताच्या संसदेला नवीन राज्यांची स्थापना, सध्याचे राज्याचे क्षेत्र, सीमा परिवर्तन, नाव देण्याचा अधिकार आहे. या दोन्ही कलमानुसार, भारताची संसद राज्यांच्या वर आहे. त्याप्रकारे राज्य स्वायत्त आहेत परंतु स्वातंत्र्य नाही. जेव्हा राज्य विरुद्ध भारत असा संघर्ष पेटेल तेव्हा भारत सर्वोत्तोपरी असेल. भारत आपल्या राज्यात हवे तसे बदल करू शकते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार