शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

भारत अन् पाकिस्तानने आण्विक ठिकाणांच्या यादींची केली देवाणघेवाण;नेमकं असं का केले?, पाहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 17:53 IST

भारत आणि पाकिस्तान या देशांमधील हा करार ३१ डिसेंबर १९८८ रोजी झाला आणि २७ जानेवारी १९९१ रोजी अंमलात आला.

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांनी आज द्विपक्षीय करारांतर्गत त्यांच्या आण्विक ठिकाणांच्या यादीची देवाणघेवाण केली. दोन्ही देशांनी तीन दशकांहून अधिक काळ सुरू ही असलेली प्रथा सुरू ठेवली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील हा करार एकमेकांच्या अण्वस्त्रांवर हल्ला करण्यापासून रोखतो.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अण्वस्त्र आस्थापना आणि सुविधांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कराराचा एक भाग म्हणून आज भारत आणि पाकिस्तानने नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील अण्वस्त्र ठिकाणांच्या नावांची एकमेकांना माहिती दिली. 

२७ जानेवारी १९९१ रोजी हा करार अंमलात आला-

भारत आणि पाकिस्तान या देशांमधील हा करार ३१ डिसेंबर १९८८ रोजी झाला आणि २७ जानेवारी १९९१ रोजी अंमलात आला. या करारानुसार, दोन्ही देशांना प्रत्येक वर्षाच्या पहिल्या जानेवारीला समाविष्ट केल्या जाणार्‍या आण्विक ठिकाणांची एकमेकांना माहिती द्यावी लागेल. काश्मीर प्रश्नावर तसेच सीमेपलीकडील दहशतवादावरून दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांदरम्यान यादीची देवाणघेवाण झाली. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यादींची ही सलग ३३वी देवाणघेवाण आहे, पहिली देवाणघेवाण १ जानेवारी १९९२ रोजी झाली होती.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानnuclear warअणुयुद्ध