शहरं
Join us  
Trending Stories
1
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
4
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
5
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
6
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
7
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
8
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
9
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
10
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
11
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
12
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
13
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
14
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
15
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
16
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
17
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
18
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
19
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
20
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

धगधगती भारत-बांगलादेश सीमा! आपसांत लग्न झाली, लपून छपून भेटायचे पण २० दिवसांत सगळं बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 6:22 PM

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात मागील २० दिवसांत ३२८ मृत्यू झालेत.  

पटना - बांगलादेशात अजान सुरू झाली की त्याचा आवाज आमच्या घरापर्यंत येतो. आमच्या इथल्या लोकांची लग्नेही बांगलादेशात झाली आहेत. सुरुवातीला आम्ही लपून छपून ये-जा करत होतो परंतु मागील २० दिवसांपासून सर्व परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या परिस्थितीत कुणी बांगलादेशात जाण्याचा विचारही करू शकत नाही असं सांगत डोळ्यात अश्रू आणि भीतीही दिसत होती. पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर येथे राहणाऱ्या कुकरौधा बॉर्डरजवळ राहणाऱ्या व्यक्तीची ही कहाणी आहे. 

बांगलादेशातील हिंसक आंदोलनाचा फटका सीमेजवळ राहणाऱ्या या लोकांच्या आयुष्यावर पडला. कारण त्यांचे बागलादेशात रोटी-बेटी नाते होते. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४०९६ किमी बॉर्डर आहे. त्यातील २२१७ किमी बॉर्डर पश्चिम बंगालला जोडलेली आहे आणि प.बंगालच्या उत्तरेकडील दिनाजपूर जिल्ह्यापासून बिहारचं किशनगंज अवघ्या २० किमी अंतरावर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मार्गेत बांगलादेशी बिहारमध्ये ये-जा करत होते. बिहारमध्ये राहणारे बांगलादेशी याच मार्गाने जातात. 

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात मागील २० दिवसांत ३२८ मृत्यू झालेत.  भारत बांगलादेश सीमेजवळील एका गावात दैनिक भास्करनं साहिब या व्यक्तीची मुलाखत घेतली. त्यात तो म्हणाला की, माझं घर बॉर्डरपासून १ किमी अंतरावर आहे. नदीच्या या बाजूला आम्ही राहतो त्याबाजूला बांगलादेशी राहतात. आम्ही एकमेकांना भेटत नाही. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी जवान तैनात असतात. आम्ही नदीजवळ जाऊ शकतो, मासे पकडू शकतो पण त्याबाजूला जाऊ शकत नाही. कारण त्याबाजूला बांगलादेश आहे असं त्याने सांगितले. 

तर इस्लामपूर बॉर्डरहून याआधी ये-जा सुरू होती. परंतु आता चिघळलेल्या परिस्थितीमुळे कडक बंदोबस्त आहे. १ महिन्यापूर्वी याठिकाणी एवढा बंदोबस्त नव्हता. ये-जा सुरू होती परंतु आता सर्व बंद आहे असं किशनगंजमध्ये राहणाऱ्या जमालनं सांगितले. किशनगंज आणि कटिहारसह बिहारमधील अनेकांची लग्न बांगलादेशात झाली आहेत. नेपाळसारखेच बांगलादेशात भारतीय लोकांची लग्न झालीत. त्यामुळे याठिकाणी बेटी-रोटीचं नाते बांगलादेशासोबत आहे. 

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेश