शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

भारत-बांगलादेश सीमा बंद करणार

By admin | Published: March 26, 2016 1:06 AM

आसाममध्ये सत्तेवर आल्यास बांगलादेशातून होणारी स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी या देशासोबतची सीमा पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन भाजपने शुक्रवारी जारी केलेल्या

गुवाहाटी : आसाममध्ये सत्तेवर आल्यास बांगलादेशातून होणारी स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी या देशासोबतची सीमा पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन भाजपने शुक्रवारी जारी केलेल्या ‘व्हिजन डाक्युमेंट’मध्ये दिले आहे. ‘आसाम व्हिजन डाक्युमेंट २०१६-२०२५- सबका साथ सबका विकास’ येथे जारी करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यावर शरसंधान साधले.अनेक दशकांपासून बेकायदेशीररीत्या स्थलांतरित लोक आसाममध्ये वास्तव्याला असून त्यामुळे या राज्यातील लोकसंख्येचा आलेख बिघडला आहे. गोगोई हे घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप जेटली यांनी सदर जाहीरनामा जारी करताना केला.प्रथमच भाजपने आसाममधील बेकायदा स्थलांतरितांच्या प्रश्नाला जाहीरनाम्यात स्थान देत प्रमुख निवडणूक मुद्यांमध्ये समाविष्ट केले आहे. उद्योग, व्यवसाय, लघु आणि मध्यम उद्योग आणि अन्य संस्थांमध्ये घुसखोरांना रोजगार देत असल्यास कठोर कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे जेटलींनी स्पष्ट केले. या राज्यात ४ आणि ११ एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. (वृत्तसंस्था)अमित शहा यांच्या दोन जाहीर सभा...भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसागर आणि सोनारी येथे दोन जाहीर सभांना संबोधित करताना भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन दिले. गरिबांना मदत करणारे सरकार गोगोई देऊ शकत नाहीत. केवळ भाजपच हे करू शकते. या राज्यातील जनतेने गोगोर्इंना १५ वर्षे सत्ता दिली मात्र हे राज्य जागच्या जागीच आहे. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत हे राज्य कधीही सुरक्षित राहिले नाही, असेही शहा यांनी म्हटले.