शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

बिक्स बैठकीत भारताने पाकिस्तानला एकाकी पाडले : चिनी मीडिया

By admin | Published: October 19, 2016 4:14 PM

नुकत्याच गोवा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या मंचाचा वापर भारताने पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी केल्याचा आरोप चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी केला आहे.

 

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि, 19 -  नुकत्याच गोवा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या मंचाचा वापर भारताने पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी केल्याचा आरोप चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी केला आहे. तसेच या अधिवेशनामधून भारताने एक जबाबदार देश अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करून एनएसजी सदस्यत्व आणि  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी दावेदारी भक्कम केल्याचेही चिनमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. 
उरी हल्ला आणि  सर्जिकल स्ट्राइकमुळे  भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने भू-रणनीतिक स्वार्थ साधण्यासाठी ब्रिम्सटेकला ब्रिक्सशी जोडले. तसेच या संमेलनास पाकिस्तान वगळता उपखंडातील सर्व देशांना निमंत्रित करून उपखंडामध्ये पाकिस्तानला एकाकी पाडले आहे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. दरम्यान, चिनी मीडियाने भारताचे प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मान्य करणे महत्त्वपूर्ण आहे. 
भारतासाठी पाकिस्तानचा समावेश असलेल्या सार्कपेक्षा ब्रिम्सटेक अधिक फायदेशीर  आहे. कारण पाकिस्तान सदस्य नसलेल्या ब्रिम्सटेकमध्ये वर्चस्व गाजवणे भारतासाठी अधिक सोपे आहे, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. 
ब्रिक्स संमेलनामध्येही पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी केलेल्या भाषणात पाकिस्तानचा दहशतवादाची जन्मभूमी असा उल्लेख केला होता. तसेच परिषदेच्या घोषणापत्रात ब्रिक्स राष्ट्रांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली होती. पण  पण चीनच्या विरोधामुळे पाकिस्तानचा दहशतवादी राष्ट्र असा उल्लेख करण्यात आला नव्हता.